शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात.

चंद्रपूर : पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात. फटाक्यांवरील एवढा मोठा खर्च टाळावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.सामाजिक वनिकरण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील हरितसेनेच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा धूर थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फटाक्यांमुळे इतरांची झोप उडवून हवा व ध्वनिप्रदूषित करणे टाळून पर्यावरण रक्षण करुन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. सण, उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाला उधान, त्यातच दिवाळी म्हटले की विचारायलाच नको. फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण. प्राचिन काळी चीन देशात फटाके उडवून मोठे ढोल वाजवून सैतान-भूत पळून जातात म्हणून फटाके फोडले जात होते. १२५ डेसिबलचे बॉम्ब फोडून आपण हवा, ध्वनिप्रदूषण प्रचंड प्रमाणात करुन पर्यावरणाचा नाश करीत आहोत. फटाक्याचा आवाज लहान मुलांमध्ये भीती निर्माण करतो. आजाऱ्यांची फटाके झोप उडवितात. आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलपेक्षा वाढली की अनेक त्रास होतात. रक्तदाब वाढतो, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण वाढतो. निद्रानाश होतो. आम्लपित्तात वाढ होते. ऐकण्यात दोष निर्माण होतो. अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. या सर्वाबरोबरच फटाक्यावरचा खर्च अनुत्पादक आहे. यासाठी लागणारा कागद, कच्चा माल हा फटाक्याबरोबरच जळतो. फटाक्यामुळे एक प्रकारे आपण बालमजुरीला प्रोत्साहन देत असतो. फटाके तयार करताना, फटाके वाजविताना तसेच फटाका भांडाराला नेहमीच आग लागून अपघात घडतात. ही समाजविघातक कृती आपण लवकरात लवकर थांबवून परिवर्तन घडविणे गरजेचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे. फटाका ज्वलनाने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड यासारखे घातक वायू निघतात. त्यामुळे खोकला, दमा हे आजार होतात.(शहर प्रतिनिधी)