शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात.

चंद्रपूर : पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात. फटाक्यांवरील एवढा मोठा खर्च टाळावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.सामाजिक वनिकरण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील हरितसेनेच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा धूर थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फटाक्यांमुळे इतरांची झोप उडवून हवा व ध्वनिप्रदूषित करणे टाळून पर्यावरण रक्षण करुन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. सण, उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाला उधान, त्यातच दिवाळी म्हटले की विचारायलाच नको. फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण. प्राचिन काळी चीन देशात फटाके उडवून मोठे ढोल वाजवून सैतान-भूत पळून जातात म्हणून फटाके फोडले जात होते. १२५ डेसिबलचे बॉम्ब फोडून आपण हवा, ध्वनिप्रदूषण प्रचंड प्रमाणात करुन पर्यावरणाचा नाश करीत आहोत. फटाक्याचा आवाज लहान मुलांमध्ये भीती निर्माण करतो. आजाऱ्यांची फटाके झोप उडवितात. आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलपेक्षा वाढली की अनेक त्रास होतात. रक्तदाब वाढतो, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण वाढतो. निद्रानाश होतो. आम्लपित्तात वाढ होते. ऐकण्यात दोष निर्माण होतो. अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. या सर्वाबरोबरच फटाक्यावरचा खर्च अनुत्पादक आहे. यासाठी लागणारा कागद, कच्चा माल हा फटाक्याबरोबरच जळतो. फटाक्यामुळे एक प्रकारे आपण बालमजुरीला प्रोत्साहन देत असतो. फटाके तयार करताना, फटाके वाजविताना तसेच फटाका भांडाराला नेहमीच आग लागून अपघात घडतात. ही समाजविघातक कृती आपण लवकरात लवकर थांबवून परिवर्तन घडविणे गरजेचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे. फटाका ज्वलनाने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड यासारखे घातक वायू निघतात. त्यामुळे खोकला, दमा हे आजार होतात.(शहर प्रतिनिधी)