शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

हरितसेना थांबविणार कोट्यवधींचा धूर

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात.

चंद्रपूर : पर्यावरण रक्षणासाठी निरोगी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. पंचमीपर्यंत व्यापारी दिवाळी साजरी करतात. यावेळीही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडली जातात. फटाक्यांवरील एवढा मोठा खर्च टाळावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.सामाजिक वनिकरण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळेतील हरितसेनेच्या पुढाकाराने एक कोटी रुपयांचा धूर थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. फटाक्यांमुळे इतरांची झोप उडवून हवा व ध्वनिप्रदूषित करणे टाळून पर्यावरण रक्षण करुन परिवर्तन घडविण्याचे आवाहनही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. सण, उत्सवाचे दिवस म्हणजे आनंदाला उधान, त्यातच दिवाळी म्हटले की विचारायलाच नको. फटाके हे दिवाळीचे मुख्य आकर्षण. प्राचिन काळी चीन देशात फटाके उडवून मोठे ढोल वाजवून सैतान-भूत पळून जातात म्हणून फटाके फोडले जात होते. १२५ डेसिबलचे बॉम्ब फोडून आपण हवा, ध्वनिप्रदूषण प्रचंड प्रमाणात करुन पर्यावरणाचा नाश करीत आहोत. फटाक्याचा आवाज लहान मुलांमध्ये भीती निर्माण करतो. आजाऱ्यांची फटाके झोप उडवितात. आवाजाची पातळी ५० ते ६० डेसिबलपेक्षा वाढली की अनेक त्रास होतात. रक्तदाब वाढतो, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण वाढतो. निद्रानाश होतो. आम्लपित्तात वाढ होते. ऐकण्यात दोष निर्माण होतो. अभ्यासात व्यत्यय निर्माण होतो. या सर्वाबरोबरच फटाक्यावरचा खर्च अनुत्पादक आहे. यासाठी लागणारा कागद, कच्चा माल हा फटाक्याबरोबरच जळतो. फटाक्यामुळे एक प्रकारे आपण बालमजुरीला प्रोत्साहन देत असतो. फटाके तयार करताना, फटाके वाजविताना तसेच फटाका भांडाराला नेहमीच आग लागून अपघात घडतात. ही समाजविघातक कृती आपण लवकरात लवकर थांबवून परिवर्तन घडविणे गरजेचे असल्याचे अंनिसने म्हटले आहे. फटाका ज्वलनाने हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होते. कार्बन मोनाक्साईड, सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड यासारखे घातक वायू निघतात. त्यामुळे खोकला, दमा हे आजार होतात.(शहर प्रतिनिधी)