शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो जनावरे कत्तलखान्याकडे

By admin | Updated: December 21, 2015 00:54 IST

यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन..

शेतकऱ्यांची लूट : तस्करांनी धरलीय कोरपन्याची वाटचंद्रपूर: यंदाचे दुष्काळी वातावरण, त्यामुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती आणि त्यातून अनेक पशुपालक आपले पशुधन कवडीमोल भावात विकत असून जिल्ह्यातील ही जनावरे कोरपनामार्गे आदिलाबादकडे कत्तलखान्यात नेली जात असल्याची माहिती आहे. काही तस्कर कोरपना येथून वणी मार्गे नागपूरकडे ही जनावरे घेऊन जात असल्याचे बोलले जात आहे. गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरी धडधाकट पाळीव जनावरेदेखील कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती आहे. यंदा जिल्ह्यात अतिशय अल्पपाऊस झाला. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर झाला आहे. शेतकऱ्यांच्या हाती सरासरी ७० टक्के उत्पादन आले. त्यातच शेतमालाला अल्पभाव मिळत असल्याने शेतीवर झालेला खर्चही त्यातून निघत नाही. त्यामुळे आलेल्या हतबलतेतून शेतकरी अल्प किंमतीत आपली जनावरे कसायांच्या हवाली करीत असल्याचे चित्र आहे. कोरपना तालुका हा तेलंगाणा व यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. त्यातच हा भाग अतिदुर्गम असल्याने या भागावर कुणाचेही लक्ष जात नाही. याचाच फायदा घेऊन जनावरांचे तस्कर या भागात सक्रीय झाले आहेत. गरजवंत शेतकऱ्यांना हेरायचे आणि अतिशय अल्प किंमतीत त्यांच्याजवळील जनावरे खरेदी करायची असा हा गोरखधंदा राजरोस सुरू आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी भरणाऱ्या बैलबाजारातही हे तस्कर सक्रीय असून गरजू शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम हे तस्कर करीत आहेत. यातून पशुपालक शेतकरी नागवला जात आहे. या तस्करांवर पोलिसांची नजर असली तरी अतिशय चतुराईने पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी करीत आहेत. (प्रतिनिधी)