शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र; ताडोबातील पाच वाघ नेणार नवेगाव-नागझिराला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 10:37 IST

उदंड झाली संख्या; स्थलांतरणाची सर्व प्रक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार

चंद्रपूर : एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या २०३ पर्यंत पोहोचल्याने मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. वाघांच्या मृत्यूच्या घटनांतही वाढ झाली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पाच वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जातील, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी दिली. सावली तालुक्यातील पेंढारी मक्ता येथील मत्स्य महोत्सवात ते बोलत होते.

मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. दिवसागणिक वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचे जीव जात आहेत. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना आवश्यक होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे अधिवास क्षेत्र कमी पडत असल्याने दोन वाघांच्या झुंजीत वाघाचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातून पाच वाघ पहिल्यांदा गोंदियातील नवेगाव- बांध, नागझिरा अभयारण्यात स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

दोन टप्प्यांत स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे दोन टप्प्यांत स्थलांतरण करण्यात येणार आहे. स्थलांतरणाची सर्व प्रक्रिया राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार होईल. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट व संभाजीनगर या तीन ठिकाणी २५ वाघ स्थलांतरित केले जातील. वाघांच्या स्थलांतरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावांमधील ग्रामस्थ भयमुक्त होतील आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत मिळेल, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागchandrapur-acचंद्रपूर