शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

By admin | Updated: December 21, 2014 22:57 IST

तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची

आशिष देरकर - गडचांदूरतालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहतात. मागील दोन दशकांपासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे. शहराला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्याने आतातरी बसस्थान होईल, अशी आशा येथील नागरिक बाळगून आहे.गडचांदूर शहर कोरपना तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व मुरली अ‍ॅग्रो या चारही सिमेंट कंपन्या गडचांदूरच्या अवती-भोवती आहे. त्यामुळे गडचांदूरला विशेष महत्त्व आहे. कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यातील ग्राहकांना कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता गडचांदूरला आल्याशिवाय पर्याय नाही. गडचांदुरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकावरील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते.कोरपना व जिवती तालुक्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र येथील २५ बाय ८ क्षेत्रफळाच्या बसस्थानकात या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात आधीच लहान क्षेत्रफळ असलेल्या या बसस्थानकात राजुरा आगाराचे छोटे कार्यालयसुद्धा सुरू करण्यात आल्याने जागा आणखी कमी झाली आहे.गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, दोन अध्यापक विद्यालये, बी.एड. महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गडचांदुरात शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रवाशांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते. आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने बसस्थानक होतील, अशी अपेक्षा आहे.