शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा?

By admin | Updated: December 21, 2014 22:57 IST

तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची

आशिष देरकर - गडचांदूरतालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ व नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त असलेल्या गडचांदूर शहरात अद्यापही बसस्थानक नाही. त्यामुळे प्रवाशांनी थांबायचे कुठे, असा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी व प्रवासी बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहतात. मागील दोन दशकांपासून असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नाही. त्यामुळे आणखी बसस्थानकासाठी किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्न येथील नागरिक तथा प्रवाशी करीत आहे. शहराला नगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाल्याने आतातरी बसस्थान होईल, अशी आशा येथील नागरिक बाळगून आहे.गडचांदूर शहर कोरपना तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. माणिकगड, अल्ट्राटेक, अंबुजा व मुरली अ‍ॅग्रो या चारही सिमेंट कंपन्या गडचांदूरच्या अवती-भोवती आहे. त्यामुळे गडचांदूरला विशेष महत्त्व आहे. कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यातील ग्राहकांना कोणत्याही वस्तूंच्या खरेदीकरिता गडचांदूरला आल्याशिवाय पर्याय नाही. गडचांदुरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बसस्थानकावरील गर्दीवरून या शहराचे महत्व कळते.कोरपना व जिवती तालुक्यातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र येथील २५ बाय ८ क्षेत्रफळाच्या बसस्थानकात या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात आधीच लहान क्षेत्रफळ असलेल्या या बसस्थानकात राजुरा आगाराचे छोटे कार्यालयसुद्धा सुरू करण्यात आल्याने जागा आणखी कमी झाली आहे.गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, शरद पवार कला महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय, दोन अध्यापक विद्यालये, बी.एड. महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गडचांदुरात शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिणामी प्रवाशांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते. आता नगर परिषदेचा दर्जा मिळाल्याने बसस्थानक होतील, अशी अपेक्षा आहे.