शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पाच हजारांच्या मदतीवर कसे उभारावे घर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 05:00 IST

सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

ठळक मुद्देनिवारा देण्याची मागणी : तोकड्या मदतीमुळे पूरग्रस्त चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : तालुक्यातील अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांसाठी अनेकजण मदतीला धावून आले. त्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय संस्था आदींनी आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करीत पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण आता खरी गरज आहे ती पडलेल्या घरांच्या उभारणीची. शासनाने पडझड झालेल्या पूरग्रस्तांना पाच हजारांचे वाटप केले असले तरी त्यात घर कसे उभारायचे, असा प्रश्न पूरग्रस्त कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.त्यामुळेच आता इतर कोणत्याही प्रकारची मदत नाही मिळाली तरी चालेल पण निवारा द्या, अशी आर्त हाक पूरग्रस्त देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात घरात पाणी शिरल्याने लोकांना खाण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. तोपर्यंत जेवण, कपडे, आश्रय देणे आवश्यक होते. आता पूर ओसरला असून पूरग्रस्त आपापल्या गावातील आपल्या घरी पोहोचले आहेत. त्यांना दोन तीन महिने पुरेल एवढे धान्य, कपडे, अंथरूण, पांघरूण पुरेसे आहे. अजूनही धान्य कपडयांच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत ज्यांची घरे पुर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना अन्नधान्य, कपडयांच्या गरजेपेक्षा महापुराने उदध्वस्त झालेल्या घरांना पुन्हा उभारण्याची गरज अधिक आहे. हीच त्यांची खरी गरज असून ते आशाळभूतपणे प्रशासनाकडे, शासनाकडे नजरा लावून बसले आहेत. उद्ध्वस्त झालेल्या घराच्या नव्याने बांधणीसाठी त्वरित शासनाकडून निधी उपलब्ध होईल आणि आपल्याला आपल्या डोईवरचा छत उभा करता येईल, या आशेवर तर जगत आहेत.शासनाकडून तत्काळ पाच हजार रुपयांची मदत मिळाली आहे. आणखी काही रुपये पूरग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. परंतु एवढयाने उद्ध्वस्त झालेली घरे उभी राहणार का, शासनाची पुढील मदत येईपर्यंत आसरा कुठे घ्यायचा, भविष्यात कसे होईल, या विवंचनेत पुरात उदध्वस्त झालेल्या घरांच्या कुटुंब प्रमुख आहेत. अख्खे कुटुंबीय चिंताग्रस्त बनली आहेत. पोटात भूक लागते परंतु उद्याच्या चिंतेने अन्नाचा घास पोटात जात नाही. रात्रभर त्यांना झोपही येत नाही, अशी विचित्र अवस्था त्यांची झाली आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींनी, लोकप्रतिनिधींनी आता निवारे उभे करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.प्रभावित गावांना समान वाटप करणे गरजेचेविशिष्ट एका गावात फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून इतर प्रभावित झालेल्या गावांना वाऱ्यावर सोडून काही विशिष्ट अशा दोन-चार गावातच मदतीचा ओघ सुरू आहे. काही गावात मदतीचा महापुर सुरू आहे.पण महापुराने प्रभावित झालेली तालुक्यातील अशीही काही गावे आहेत, त्या ठिकाणी बºयाच मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु त्या गावांना आजतागायत कोणीही भेट देऊन त्यांचे सांत्वन केले नाही. फक्त सर्व्हेच्या माध्यमातून शासकीय मदत पोहचली आहे. इतरांचे फारसे लक्ष काही गावांकडे जातांना दिसून येत नाही.दोन मतदारसंघ विभाजनाचा पूरग्रस्तांना फटकातालुक्यातील पूरग्रस्त गावे दोन विधानसभा मतदारसंघात विभागली असल्याने लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत देताना आपले उद्याचे राजकीय भविष्य लक्षात घेऊन पूरग्रस्तांना मदत देत आहेत. हा पूरग्रस्त आपल्या पक्षाचा नाही म्हणून अशा पूरग्रस्तांना काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डावलले असल्याचे प्रकार तालुक्यात घडले आहेत. अशा गंभीर परिस्थितीत मानवीय दृष्टीकोनातून खºया गरजूपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे.

टॅग्स :floodपूर