शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्याची सभा

By admin | Updated: September 11, 2016 00:47 IST

चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन...

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिका निवडणूक २०१७ या विषयाच्या अनुषंगाने रिपब्लिकन-आंबेडकरी जनतेच्या ऐक्य बैठकीचे आयोजन बॅर. राजाभाऊ खोबरागडे भवन येथे प्रवीण खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रवीण खोबरागडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व आंबेडकरी विचारांच्या पक्षांना संघटनांना, बौद्ध मंडळांना सोबत घेऊन वार्ड प्रभाग निहाय समिती गठित करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक प्रभागात त्यातील गटानुसार समाजातील एकच उमेदवार उभा करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यास रिपब्लिक, आंबेडकरी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.या सभेत आंबेडकरी चळवळीत कार्यरत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना बौद्ध विचारांचे प्रतिनिधी, शहरातील व जिल्ह्यातील शेकडो आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती. राजू झोडे, मोनल भडके, राजकुमार जवादे, डॉ. राकेश गावतुरे, बाजीराव उंदिरवाडे, धृव करमरकर, जयप्रकाश कांबळे, रमेशचंद्र राऊत, प्रतिक डोर्लीकर आदी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यासाठी तयार असल्याचे सांगितले.यावेळी धनंजय मेश्राम, वामन सरदार, सविता कांबळे, वनिता सहारे, ज्योतीताई सहारे, महादेव कांबळे, अशोक निमगडे, प्रशांत रामटेके, अशोक फुलझेले आदींनी आंबेडकरी जनतेच्या ऐक्यामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी, महिला मंडळांनी व युवकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व आंबेडकरी चळवळ अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. सभेचे संचालन राजू खोबरागडे, प्रास्ताविक विशालचंद्र अलोणे तर आभार प्रा. नितीन रामटेके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिदास देवगडे, स्नेहल रामटेके, भाऊराव दुर्योधन, संदीप देव, गायत्री कवाडे, नीतू झाडे, राहुल फुलझेले, ज्योती शिवणकर, नेहा मेश्राम, राजश्री शेंडे आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)