शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

हॉटेल्स व्यावसायिकांना अल्टिमेटम

By admin | Updated: October 10, 2015 00:14 IST

परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : परवाना नुतनीकरणासाठी अटींची तत्काळ पूर्तता कराचंद्रपूर : परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे. परवान्यासाठी लागू असलेल्या अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे परवाने अडवून ठेवले आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत अटींची पूर्तता करावी, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल्स व्यावसायिकांना दिला आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या अलिकडच्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. याशिवाय हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे बाहेर शहरातून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याचा विचार करीत चंद्रपूर शहरात अनेक जणांनी हॉटेल थाटून आपला व्यवसाय सुरू केला आहे. शहरात लहान हॉटेल्ससोबत शंभरावर मोठे हॉटेल्सही आहेत. या मोठ्या हॉटेल्स मालकांना महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी हॉटेल्समध्ये आग सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता व बांधकाम नियमानुकूल असणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल्स मालकांनी या अटींची पूर्तता केलेली नाही. काही व्यावसायिकांनी कागदोपत्री निवासी जागा दाखवून हॉटेल्सचे बांधकाम केले आहे. परंतु महानगरपालिकेत जाऊन त्याचे व्यावसायिक रुपांतर केले नाही. याशिवाय अनेक हॉटेल्समध्ये नियमानुसार वाहनतळ नाही. त्यामुळे हॉटेल ज्या परिसरात आहे, त्या परिसरात वाहतुकीचा प्रश्न उद्भवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हॉटेल्सचे परवाना नूतनीकरण अडवून ठेवले. परवाना देताना लागू असलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जाईल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या संदर्भात महानगरपालिकेलाही निर्देश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेकडूनही हॉटेलमध्ये आग सुरक्षा यंत्रणा आहे का, स्वच्छता ठेवली जाते का, वाहनतळ आहे का, या बाबी तपासूनच तसे प्रमाणपत्र दिले जात आहे. विशेष म्हणजे, २१ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिकांची बैठक घेऊन या संदर्भात निदेश दिले होते. बुधवारी निवासी जागेवर बांधकाम करणाऱ्या शहरातील १९ हॉटेल्स मालकांना प्रशासनाकडून दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी विविध मुद्यांवर जिल्हा प्रशासनाने हॉटेल्समालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसचे समाधानकारक उत्तर व्यावसायिकांकडून देण्यात आले नसल्याची माहिती आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत सर्व अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी करून परवाना नूतनीकरण करून घ्यावा, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.