शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

हॉटेल्स व्यावसायिकांना अल्टिमेटम

By admin | Updated: October 10, 2015 00:14 IST

परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : परवाना नुतनीकरणासाठी अटींची तत्काळ पूर्तता कराचंद्रपूर : परवान्याचे नूतनीकरण न करताच चंद्रपुरात हॉटेल्स व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू ठेवली आहे. परवान्यासाठी लागू असलेल्या अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी केली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे परवाने अडवून ठेवले आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत अटींची पूर्तता करावी, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून हॉटेल्स व्यावसायिकांना दिला आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या अलिकडच्या काही वर्षात चांगलीच वाढली आहे. याशिवाय हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे बाहेर शहरातून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याचा विचार करीत चंद्रपूर शहरात अनेक जणांनी हॉटेल थाटून आपला व्यवसाय सुरू केला आहे. शहरात लहान हॉटेल्ससोबत शंभरावर मोठे हॉटेल्सही आहेत. या मोठ्या हॉटेल्स मालकांना महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी हॉटेल्समध्ये आग सुरक्षा यंत्रणा, स्वच्छता व बांधकाम नियमानुकूल असणे बंधनकारक आहे. मात्र शहरातील अनेक हॉटेल्स मालकांनी या अटींची पूर्तता केलेली नाही. काही व्यावसायिकांनी कागदोपत्री निवासी जागा दाखवून हॉटेल्सचे बांधकाम केले आहे. परंतु महानगरपालिकेत जाऊन त्याचे व्यावसायिक रुपांतर केले नाही. याशिवाय अनेक हॉटेल्समध्ये नियमानुसार वाहनतळ नाही. त्यामुळे हॉटेल ज्या परिसरात आहे, त्या परिसरात वाहतुकीचा प्रश्न उद्भवत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने हॉटेल्सचे परवाना नूतनीकरण अडवून ठेवले. परवाना देताना लागू असलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच परवाना दिला जाईल, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या संदर्भात महानगरपालिकेलाही निर्देश दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेकडूनही हॉटेलमध्ये आग सुरक्षा यंत्रणा आहे का, स्वच्छता ठेवली जाते का, वाहनतळ आहे का, या बाबी तपासूनच तसे प्रमाणपत्र दिले जात आहे. विशेष म्हणजे, २१ सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिकांची बैठक घेऊन या संदर्भात निदेश दिले होते. बुधवारी निवासी जागेवर बांधकाम करणाऱ्या शहरातील १९ हॉटेल्स मालकांना प्रशासनाकडून दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती आहे. त्यापूर्वी विविध मुद्यांवर जिल्हा प्रशासनाने हॉटेल्समालकांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. मात्र नोटीसचे समाधानकारक उत्तर व्यावसायिकांकडून देण्यात आले नसल्याची माहिती आहे. आता १० आॅक्टोबरपर्यंत सर्व अटींची पूर्तता या व्यावसायिकांनी करून परवाना नूतनीकरण करून घ्यावा, अन्यथा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.