शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरिता विदर्भात बांधणार वसतिगृह : मकरंद अनासपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:36 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो.

आॅनलाईन लोकमतवरोरा : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडल्यास पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न बिकट होतो. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे, याकरिता नाम फाऊंडेशनच्या वतीने विदर्भात वसतिगृह सुरू आहे, अशी माहिती सिनेकलावंत मकरंद अनासपुरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भद्रावती येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित ‘उलट सुलट’ नाट्यप्रयोगासाठी आमदार बाळू धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट दिली होती. मकरंद अनासपुरे म्हणाले, नाना पाटेकर आणि मी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता आम्ही लोकसहभागातून काम करीत आहोत. लोकसहभागातून सिंचनाची वाढ झाल्यास शेतकरी दोन पिके एका वर्षात घेवून समृद्ध होवू शकतील. यातून आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. लोकसहभागामुळे या उपक्रमाचे महत्त्व समाजाला कळेल, असेही अनासपुरे यांनी नमूद केले.मराठवाडा, आणि कोकणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय वसतिगृहातून केली आहे. आज शेकडो मुले इयत्ता १ ते १० पर्यंत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणाचीही मोफत व्यवस्था लोकसहभागातून करण्यात येणार आहे. नाम फाऊंडेशनच्या कामाला विदर्भातही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून अनासपुरे म्हणाले, गावखेड्यातील राजकारण निवडणुकीपर्यंत मर्यादित रात नाही. मोठे नेते एकमेकांच्या गळ्यात गळा मिळवितात. तर लहान कार्यकर्ते राजकारण करून विकास कामांमध्ये बाधा आणतात.देशात बाबा आणि बुवा खुप आहेत. त्यामुळे आपल्याला देवपण नको आहे. त्यासाठीच एकदा ज्या ठिकाणी काम झाले. तिथे आम्ही जावून सत्कारही स्वीकारत नाही. कामाची उभारणी झाल्यानंतर नागरिकांनी ते पुढे नेले पाहिजे, अशी नाम संघटनेची भूमिका आहे, याकडेही मकरंद अनासपुरे यांनी लक्ष वेधले.