शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धानोलीवासीयांच्या मतदानाच्या आशा मावळल्या

By admin | Updated: May 10, 2014 00:08 IST

लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आल्याच्या निषेधार्थ वरोरा विधान क्षेत्रातील धानोली ...

वरोरा : लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या वेळी मतदान केंद्र ऐनवेळी बदलविण्यात आल्याच्या निषेधार्थ वरोरा विधान क्षेत्रातील धानोली गावातील मतदारांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे निवेदन पाठवून पुनश्च मतदान घेण्यात यावे, अशी मागणी केली होती. परंतु महाराष्ट्रातील अंतिम टप्प्यातील मतदान नुकतेच आटोपल्याने आता धानोली येथे मतदान होणार नाही, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. त्यामुळे मतदानाबाबतच्या धानोलीवासियांच्या आशा मावळल्या असल्याचे मानले जात आहे. ७५ वरोरा विधानसभा क्षेत्रांतर्गत धानोली गाव येत असून मतदारांची संख्या जवळपास ९५० आहे. १९५२ पासून धानोली जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रत्येक निवडणुकीचे मतदान केंद्र ठेवण्यात येते. धानोली मतदान केंद्राला नजिकचे वाघेडा गाव जोडण्यात येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानापूर्वी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणे सुकर व्हावे, याकरिता मतदान क्रमांक, केंद्र क्रमांक व यादी भाग क्रमांक तसेच मतदारांचे छायाचित्र असलेल्या चिट्ठ्या वाटप करण्यात आल्य्टÞ त्यावर जि.प. शाळा धानोली मतदान केंद्र नमूद करण्यात आले. परंतु मतदानाच्या एक दिवसापूर्वी मतदान घेणारी चमू आली. त्यांच्या आदेशात मतदान केंद्र धानोली ऐवजी वाघेडा शाळा असा उल्लेख करण्यात आला. मतदानाच्या एक दिवस आधी धानोलीतील मतदारांना वाघेडा येथे मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. धानोली ते वाघेडा या गावामध्ये सहा किलोमिटरचे अंतर आहे. धानोली गाव मोठे असून तसेच १९५२ पासून असलेल्या मतदान केंद्र बदलविण्यात आल्याने त्याच दिवशी धानोली ग्रामपंचायतीने तातडीने सभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. प्रशासनातील अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी धानोली गावात धाव घेवून मतदान करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु धानोली येथील मतदारांनी प्रतिसाद दिला नाही व आपला बहिष्कार कायम ठेवला. ग्रामस्थांच्यावतीने धानोली केंद्रावर मतदान घेण्याकरिता निवेदन निवडणूक आयोग व स्थानिक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले. परंतु २४ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा संपला. त्यानंतरही धानोलीमध्ये मतदान घेण्याबाबत कुठलाही आदेश आला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी .दिली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून मतदार वंचित राहणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)