शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थी राजकारणामुळे घरकुलाची आशा मावळली

By admin | Updated: June 16, 2017 00:35 IST

वादळवाऱ्यात घराची केव्हाही पडझड होण्याची शक्यता असणाऱ्या कुटुंबीयांना निवाऱ्यासाठी घरकुलाची नितांत आवश्यकता आहे.

भूमिहीन मजुराची व्यथा : यादीत सधन व्यक्तींच्या नावांचा भरणाशशीकांत गणवीर। लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वादळवाऱ्यात घराची केव्हाही पडझड होण्याची शक्यता असणाऱ्या कुटुंबीयांना निवाऱ्यासाठी घरकुलाची नितांत आवश्यकता आहे. मात्र गाव पुढाऱ्याच्या राजकीय चढाओढी, द्वेष व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सधन कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. परंतु गरीब भूमिहीन कुटुंबाना अजूनही न्याय मिळत नसल्याने भेजगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येसगाव येथील बंडू उर्फ नमेश केमचंद गणवीर यांच्या भूमिहीन फाटक्या संसाराला अजूनही घरकुलाची प्रतीक्षा आहे. मात्र गावातील स्वार्थी राजकारणामुळे घरकुलाची आशाच मावळल्याचे वास्तव चित्र आहे. येसगाव येथील नमेश गणवीर हे जवळपास पंधरावर्षांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते. पूर्वी त्यांच्या वडीलाचे नाव व स्वत:चे नाव बीपीएल यादीत समाविष्ट होते. दोघांचीही नावे बीपीएल यादीत असली तरी त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. नवीन आर्थिक जनगणना झाली, तेव्हा नमेश गणवीर हा मजुरीसाठी गेला होता. तेव्हा प्रगणकाला चुकीची माहिती दिल्याने भूमिहीन असतानाही राजकीय डावापोटी त्यांना बीपीएलपासून वंचित करण्यात आले. े गावातील गढूळ राजकारणाचा फटका बसला व घरकुलासह शासनाच्या विविध योजनांपासून दूर राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.शासन आपल्या अनेक योजना गरीबांच्या विकासाकरिता राबवीत असतो. गरजूंची यादी तयार करुन त्याला ग्रामसभेची मंजुरी दिली जाते. मात्र स्वार्थी राजकारात खऱ्या लाभार्थ्यांना डावलून आपल्या जवळच्यांना घरकुलाची मंजुरी मिळवून देण्याचा प्रकार होत असल्याने गरजूंना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. नमेश गणवीर हा फायलेरियाने ग्रस्त असल्याने कठीण कामे जमत नाही. त्यामुळे घरीच कपडे प्रेस करण्याचे काम करुन आपल्या संसाराचा गाडा रेटतो. पंधरा वर्षांनंतर सरकार बदलले. मात्र परिस्थिती बदलली नाही. आधी दारिद्र्य रेषेखालील कुटंबालाच घरकुल मिळायचे. आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळत आहेत. यात बीपीएलची अट नसली तरी २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत ग्रामपंचायतीला एक यादी प्राप्त झाली आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांना निवडणे, सधन लाभार्थी डावलणे व गरजूंना यादीत समाविष्ट करण्याचे ग्रामसभेला अधिकार आहेत. यातही नमेश गणवीर यांचे नाव नसल्याने त्यांना घरकुल मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.असे असले तरी या यादीत अनेक सधन व्यक्तींची नावे आहेत काहींची मुले नोकरीवर आहेत, अशांना ग्रामसभेने घरकुलासाठी मंजुरी दिली. मात्र अल्पभूधारक, भूमिहीन कुटुंबाना राजकारण्यांची ग्रामसभा नावापूरतीच घेऊन डावलल्याने खऱ्या लाभार्थ्यांची घरकुलाची आशाच मावळली आहे. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी असल्यातरी त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा या योजनांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावकुसावर झोपड्या टाकून आयुष्याला ठिगळ लावणारे बेघरवासी तसेच उपेक्षेचे जीवन जगत आल्याचे चित्र आहे.