शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थी राजकारणामुळे घरकुलाची आशा मावळली

By admin | Updated: June 16, 2017 00:35 IST

वादळवाऱ्यात घराची केव्हाही पडझड होण्याची शक्यता असणाऱ्या कुटुंबीयांना निवाऱ्यासाठी घरकुलाची नितांत आवश्यकता आहे.

भूमिहीन मजुराची व्यथा : यादीत सधन व्यक्तींच्या नावांचा भरणाशशीकांत गणवीर। लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : वादळवाऱ्यात घराची केव्हाही पडझड होण्याची शक्यता असणाऱ्या कुटुंबीयांना निवाऱ्यासाठी घरकुलाची नितांत आवश्यकता आहे. मात्र गाव पुढाऱ्याच्या राजकीय चढाओढी, द्वेष व प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सधन कुटुंबीयांना घरकुलाचा लाभ मिळत आहे. परंतु गरीब भूमिहीन कुटुंबाना अजूनही न्याय मिळत नसल्याने भेजगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या येसगाव येथील बंडू उर्फ नमेश केमचंद गणवीर यांच्या भूमिहीन फाटक्या संसाराला अजूनही घरकुलाची प्रतीक्षा आहे. मात्र गावातील स्वार्थी राजकारणामुळे घरकुलाची आशाच मावळल्याचे वास्तव चित्र आहे. येसगाव येथील नमेश गणवीर हे जवळपास पंधरावर्षांपूर्वी ग्रामपंचायत सदस्य होते. पूर्वी त्यांच्या वडीलाचे नाव व स्वत:चे नाव बीपीएल यादीत समाविष्ट होते. दोघांचीही नावे बीपीएल यादीत असली तरी त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. नवीन आर्थिक जनगणना झाली, तेव्हा नमेश गणवीर हा मजुरीसाठी गेला होता. तेव्हा प्रगणकाला चुकीची माहिती दिल्याने भूमिहीन असतानाही राजकीय डावापोटी त्यांना बीपीएलपासून वंचित करण्यात आले. े गावातील गढूळ राजकारणाचा फटका बसला व घरकुलासह शासनाच्या विविध योजनांपासून दूर राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.शासन आपल्या अनेक योजना गरीबांच्या विकासाकरिता राबवीत असतो. गरजूंची यादी तयार करुन त्याला ग्रामसभेची मंजुरी दिली जाते. मात्र स्वार्थी राजकारात खऱ्या लाभार्थ्यांना डावलून आपल्या जवळच्यांना घरकुलाची मंजुरी मिळवून देण्याचा प्रकार होत असल्याने गरजूंना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. नमेश गणवीर हा फायलेरियाने ग्रस्त असल्याने कठीण कामे जमत नाही. त्यामुळे घरीच कपडे प्रेस करण्याचे काम करुन आपल्या संसाराचा गाडा रेटतो. पंधरा वर्षांनंतर सरकार बदलले. मात्र परिस्थिती बदलली नाही. आधी दारिद्र्य रेषेखालील कुटंबालाच घरकुल मिळायचे. आता पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळत आहेत. यात बीपीएलची अट नसली तरी २०११ च्या आर्थिक सर्वेक्षणावर आधारीत ग्रामपंचायतीला एक यादी प्राप्त झाली आहे. या यादीतील पात्र लाभार्थ्यांना निवडणे, सधन लाभार्थी डावलणे व गरजूंना यादीत समाविष्ट करण्याचे ग्रामसभेला अधिकार आहेत. यातही नमेश गणवीर यांचे नाव नसल्याने त्यांना घरकुल मिळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.असे असले तरी या यादीत अनेक सधन व्यक्तींची नावे आहेत काहींची मुले नोकरीवर आहेत, अशांना ग्रामसभेने घरकुलासाठी मंजुरी दिली. मात्र अल्पभूधारक, भूमिहीन कुटुंबाना राजकारण्यांची ग्रामसभा नावापूरतीच घेऊन डावलल्याने खऱ्या लाभार्थ्यांची घरकुलाची आशाच मावळली आहे. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांसाठी असल्यातरी त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा या योजनांचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. गावकुसावर झोपड्या टाकून आयुष्याला ठिगळ लावणारे बेघरवासी तसेच उपेक्षेचे जीवन जगत आल्याचे चित्र आहे.