शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

आशा ठरल्या देवदूत

By admin | Updated: September 13, 2014 01:12 IST

ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण

राजकुमार चुनारकर खडसंगी ग्रामीण भागात गावागावामध्ये घराघरातून होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण कमी झाल्यामुळे अर्भक मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होत असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. मागील काही वर्षात चिमूर तालुक्यातील आरोग्य संस्थात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रसुतीमध्ये अर्भक मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. यासाठी आशा वर्कर घरोघरी जाऊन गरोदर माताची नोंद व आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्यासाठी गरोदर माताला प्रवृत्त करीत आहे. त्यामुळे या नवजात बालकासाठी आशा वर्कर देवदूत ठरत आहेत.पूर्वी रुग्णालयात येण्याऐवजी ग्रामीण गरोदर महिलांची घरीच प्रसुती करण्याकडे कल होता. त्यामुळे जन्माला येणाऱ्या कित्येक बालकांना गावामधील अपुऱ्या सोयी सुविधाअभावी उपचार मिळत नव्हते. परिणामी अर्भक, बालमृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मागील काही वर्षांपासून आशा वर्करच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीची मोहिम शासनाने हाती घेतली आहे. आदिवासी ग्रामीण कुटुंबातील गरोदर महिलांची माहिती घेऊन नोंदी करण्याची जबाबदारी या आशा वर्करवर सोपविण्यात आली आहे. आदिवासी ग्रामीण कुटूंबाचे मतपरिवर्तन करून प्राथमिक आरोग्य केंद्रातच प्रसुती करण्याचे प्रयत्न या स्वयंसेविका करतात. त्यामुळे बालमृत्यूच्या प्रमाणात घट होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या आशा वर्कर नवजात बालकासाठी देवदूत ठरत आहेत. या आशा वर्करांना शासनातर्फे मानधन देण्यात येत असल्याने हिरहिरीने काम करीत असल्याचे चित्र गावखेड्यात पहावयास मिळत आहे. याचा लाभ ग्रामीण भागातील अशिक्षीत कुटुंबातील प्रसुती प्राथमिक आरोग्य केंद्रातच होण्यास मदत झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकाचे शारीरिक तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या किट वापरण्यात येतात. त्यामुळे बालकांना आरोग्य सुविधा मिळतात व बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. चिमूर तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्राव्यतिरिक्त ३७ उपकेंद्राची स्थापना केली आहे. या सर्व केंद्रातून प्रसुतीची व्यवस्था केली आहे. पूर्वी दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात प्रसुतीची व्यवस्था नसल्याने घरीच प्रसुती करण्यात येत होती.