शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

ज्वारीचा पेरा घटल्याने हुरडा पार्टी झाली कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:47 IST

कधीकाळी ग्रामीण भागात रानमेवा म्हणून ज्ञात असलेली हुरडा पार्टी ज्वारीचा पेरा घटल्याने कालबाह्य झाली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या प्रोत्साहनाची गरज : बदलती शेती कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती (आयुधनिर्माणी) : कधीकाळी ग्रामीण भागात रानमेवा म्हणून ज्ञात असलेली हुरडा पार्टी ज्वारीचा पेरा घटल्याने कालबाह्य झाली आहे.शेतकºयांच्या आप्तस्वकीयांसह नातेवाईकांना हिवाळा सुरु झाल्यानंतर गुलाबी व कुडकुडणाºया थंडीत शेतात पेटत्या शेकोटीजवळ बसून ज्वारीच्या कणसांना भाजून खाण्याची मजा आनंददायीच असायची. परंतु अलिकडे शेतातील बदलत्या पीक पद्धतीने हुरडा पार्टी कालबाह्य झाल्याने शेतकरी परिवाराला मायेच्या धाग्यात गुंफणारा धागाच तुटला आहे.दशकापूर्वी ग्रामीण भागात सर्वत्र ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे शेतशिवार ज्वारीच्या धांड्यानी बहरलेले दिसायचा. पूर्वी हिवाळा आला रे आला की, सर्वत्र हुरडा पार्टीची रेलचेल असायची. या निमित्ताने शहरात असलेले कास्तकारांचे नातेवाईक हुरडा खाण्यासाठी खास गावाकडे वळायचे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात स्नेहबंध वृद्धींगत व्हायचे. परंतु अलिकडे कापूस व सोयाबिन सारख्या नगदी पिकांचे उत्पादन वाढल्याने शेतकरी ज्वारी लावण्याकडे दुर्लक्ष करीतआहे. रोही, रानडुकरे व रानटी पशु तथा पक्षांवर अंकुश ठेवणे कठीण झाल्याने शेतकºयांनी ज्वारी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. अनेक भागात केवळ जनावरांना चारा म्हणून कडबा मिळावा यासाठीच ज्वारी पेरतात. त्यामुळे ज्वारीची हुरडा पार्टी थंडबस्त्यात पडल्याने खवय्यांना या निमित्ताने खेड्यात हुरडा पार्टीत मिळणाºया वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, तिळाची चटणी, दह्याची चटणी अशा पकवानांना वंचित व्हावे लागत आहे. कधीकाळी सामान्य शेतकºयांच्या स्वत:च्या कुटुंब ऐक्यात व आप्तांच्या मनोमिलनात इतकेच नव्हे, तर राजकीय घडामोडीतही मोठी भूमिका बजावणारी हुरडा पार्टी शासनाच्या बदलत्या शेतीधोरणामुळे कालबाह्य झाली आहे.