शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

युक्रेनमधून चंद्रपूरचे सहा विद्यार्थी स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून, उर्वरित दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून, दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले आहेत. चार विद्यार्थी दिल्ली येथे पोहचले असून, उर्वरित दोन विद्यार्थी येण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी एक जण हंगेरी या देशाच्या सीमेवर असून, दुसरा विद्यार्थी रोमानिया या देशाच्या मार्गावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हर्षल बलवंत ठवरे (चिमूर), आदिती अनंत सायरे (वरोरा), साहिल संतोष भोयर (बल्लारपूर), खुशाल बिपुल बिस्वास (चंद्रपूर), शेख अलिशा करीम (राजुरा) आणि गुंजन प्रदीप लोणकर  (चिमूर) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चिमूरची ऐश्वर्या प्रफुल खोब्रागडे, चंद्रपूर येथील धीरज असीम विश्वास आणि महेश भोयर तर ब्रह्मपुरी येथील महक उके दिल्ली येथे पोहोचले आहेत. भद्रावती येथील नेहा शेख ही हंगेरीच्या सीमेवर असून, चंद्रपूरचा दीक्षाराज अकेला हा रोमानिया देशाच्या सीमेकडे वाटचाल करीत असल्याची माहिती संबंधितांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आम्ही वाचलो,  इतरही सुखरूप परतावे

बल्लारपूर : एमबीसीने दिलेल्या सूचनेमुळे आम्ही सुरक्षितरित्या घरी परतलोय, मात्र युद्ध सुरु झाल्यानंतर अजूनही बरेच भारतीय विद्यार्थी तिथे अडकले आहेत. तेदेखील सुखरूप घरी परतावे, अशी भावना युक्रेनहून आलेल्या बल्लारपूरच्या साहील संतोष भोयर या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. साहील हा मागील पाच वर्षांपासून युक्रेनच्या जोफ्रोजेस्ट स्टेट वैद्यकीय विद्यापीठामध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे. त्यांनी सांगितले की, तिकडे दोन-तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये छोटेछोटे युद्ध सुरूच होते. परंतु यावेळी सैनिकांची संख्या वाढल्यामुळे आम्हाला एमबीसीने १८ फेब्रुवारीला पत्र दिले की, सध्या तुम्ही हा देश सोडून आपल्या गावी परत जा. आपण विद्यापीठाची समस्या नंतर सोडवू. त्याप्रमाणे आम्ही हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी बसने कीव्ह येथे गेलो व तेथून फ्लाइटने युद्ध सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर निघालो. पण उर्वरित ३० विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकून राहिले आणि दुसऱ्या दिवशी युद्धाचा धडाका सुरु झाला. 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी