शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

शेतकऱ्यांनी खरिपात वापरले ६५० कोटींचे घरचे बियाणे; कृषी विभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:52 IST

Chandrapur News खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तब्बल ६५० कोटींचे घरचे बियाणे वापरले, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

ठळक मुद्दे राज्यात रुजला ग्राम बीजोत्पादनाचा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तब्बल ६५० कोटींचे घरचे बियाणे वापरले, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

राज्यातील खरीप हंगामात कापूस, साेयाबीन तसेच कडधान्यांचे लागवड क्षेत्र वाढले. या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम सुरू केली. या मोहिमेतून सुमारे ६,५०० कोटींचे ३१ लाख क्विंटल बियाणे तयार झाले. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३९ लाख हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात ४३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के राहावा, असे लक्ष्यांक होते. यानुसार शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरतील, असेही गृहीतक ठेवण्यात आले. राज्यातील बियाणे बाजारात यंदा ११ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज होती. ही गरज पाहून महाबीजने २.१० लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ८ हजार क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांनी ९ लाख ६५ हजार क्विटल बियाणे पुरवावे, असे नियोजन केले होते. खासगी बाजारात बियाणांचा पुरवठा मर्यादित होता. दुसरीकडे पेराही वाढत होता. मात्र, शेतकऱ्यांनी घरचे ३१ लाख क्विंटल बियाणे वापरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा बंपर पेरा होऊनसुद्धा बियाणे टंचाई जाणवली नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

शेतकऱ्यांनी विकत घेण्याऐवजी घरचेच बियाणे वापरले आहे. यातून बियाणांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचला. राज्यातील बीजोत्पादन अभियानाचे हे यश आहे.

-दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, पुणे

टॅग्स :agricultureशेती