शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांनी खरिपात वापरले ६५० कोटींचे घरचे बियाणे; कृषी विभागाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:52 IST

Chandrapur News खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तब्बल ६५० कोटींचे घरचे बियाणे वापरले, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

ठळक मुद्दे राज्यात रुजला ग्राम बीजोत्पादनाचा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकरी दर्जेदार बियाणांची शोधाशोध करतात. बियाणे वेळेवर मिळाले नाही तर नुकसानाला सामोरे जावे लागते. खासगी कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होईलच याची खात्री नसते. मात्र, ग्राम बीजोत्पादनाला शासनाने प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरिपात तब्बल ६५० कोटींचे घरचे बियाणे वापरले, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

राज्यातील खरीप हंगामात कापूस, साेयाबीन तसेच कडधान्यांचे लागवड क्षेत्र वाढले. या शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम सुरू केली. या मोहिमेतून सुमारे ६,५०० कोटींचे ३१ लाख क्विंटल बियाणे तयार झाले. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३९ लाख हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात ४३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के राहावा, असे लक्ष्यांक होते. यानुसार शेतकऱ्यांनी हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरतील, असेही गृहीतक ठेवण्यात आले. राज्यातील बियाणे बाजारात यंदा ११ लाख ४१ हजार क्विंटल सोयाबीन बियाणांची गरज होती. ही गरज पाहून महाबीजने २.१० लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाने ८ हजार क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांनी ९ लाख ६५ हजार क्विटल बियाणे पुरवावे, असे नियोजन केले होते. खासगी बाजारात बियाणांचा पुरवठा मर्यादित होता. दुसरीकडे पेराही वाढत होता. मात्र, शेतकऱ्यांनी घरचे ३१ लाख क्विंटल बियाणे वापरले. त्यामुळे यंदा सोयाबीनचा बंपर पेरा होऊनसुद्धा बियाणे टंचाई जाणवली नाही, असा दावा कृषी विभागाने केला आहे.

शेतकऱ्यांनी विकत घेण्याऐवजी घरचेच बियाणे वापरले आहे. यातून बियाणांवर होणारा शेतकऱ्यांचा खर्च वाचला. राज्यातील बीजोत्पादन अभियानाचे हे यश आहे.

-दिलीप झेंडे, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग, पुणे

टॅग्स :agricultureशेती