शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

होयं...रस्ते होताहेत; इतर समस्यांचे काय ?

By admin | Updated: May 8, 2016 00:49 IST

स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत.

मनपा झाली, नाल्या तशाच : एमईएल प्रभाग पाण्यामुळे वैतागलाचंद्रपूर : स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत. एमईएल प्रभागात बहुप्रतीक्षेनंतर आता कुठे रस्ते होऊ लागले आहेत. मात्र इतर समस्या मनपा होऊन चार वर्ष होऊनही सुटल्या नाहीत. पिण्याचे पाणी, नाल्या आणि घरात शिरणारे नाल्यातील पाणी, यामुळे आम्ही पार वैतागलो आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्ड स्मार्ट सिटीत यावा. तो वॉर्डही ‘स्मार्ट’ व्हावा, अशी चंद्रपुरातील प्रत्येक नागरिकांसोबतच ‘लोकमत’चीदेखील इच्छा आहे. मात्र यासाठी विकासाची गती कुठे आणि कितपत वाढवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी लोकमतने प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे ठरविले आहे. सात हजार मतदार आणि सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या येथील एमईएल प्रभागात ‘लोकमत चमू’ शनिवारी सकाळी दाखल झाली. यावेळी नागरिकांनी अत्यंत तळमळीने ‘लोकमत’जवळ आपल्या समस्या मांडल्या. नव्हेतर समस्यांचा पाढाच वाचला. एमईएल प्रभागातील संजयनगरमधील रेल्वे क्रासींगजवळ मोठ्या संख्येने नागरिकांची घरे आहेत. मात्र या ठिकाणी रस्ता सोडला तर उर्वरित सर्वच समस्या वर्षानुवर्षापासून जैसे थेच आहेत. या परिसरात सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली. ही पाईप लाईन आता अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. या लिकेजमध्ये चक्क नाल्यांचे पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांच्या घरी भरमसाठ शुल्क भरूनही नळातून नालीतील काळे पाणी येते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील शालू बरडे या महिलेने सांगितले की आठवड्यातून केवळ दोनदा नळ येते. नाल्यांची सफाई तर महिनोमहिने केली जात नाही. त्यामुळे नाल्यांमधून दुर्गंधी येत असते. पंकज जवादे म्हणाले, नाल्यांची सफाई नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच परिसरातील कल्पना मिलिंद उराडे या महिलेने तर विजेबाबत चांगलाच रोष व्यक्त केला. वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक कामे प्रभावित होत असल्याचे त्या म्हणाल्या.एमईएल प्रभागात काही ठिकाणी रस्ते तयार करण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याचे जाणवले. काही ठिकाणी अजूनही कच्चे आणि खड्डेयुक्त रस्ते आहेत. या प्रभागातील सावित्रीबाई फुले चौकातही पाणी, नाल्या व काही ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाल्या आत्या मोडकडीस आल्या आहेत. लोकमत चमू प्रभागातील केरला कॉलनीत गेली, तेव्हा नागरिकांनी, विशेषत: महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या लोकमतजवळ मांडल्या. केरला कॉलनीत नाल्या तुटलेल्या आहेत, नाल्याची सफाईदेखील वर्षभर केली जात नाही, सार्वजनिक नळ नाही, हातपंप नाही, त्यामुळे पाण्याची समस्या नेहमीच जाणवते, पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य असते, मोठ्या नाल्याचे पाणी घरात शिरते, असा समस्यांचा पाढाच प्रिया फसादे, मंदा त्रिकोंडवार व आणखी दहाबारा महिलांनी लोकमतपुढे वाचला. (लोकमत चमू)