शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

होयं...रस्ते होताहेत; इतर समस्यांचे काय ?

By admin | Updated: May 8, 2016 00:49 IST

स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत.

मनपा झाली, नाल्या तशाच : एमईएल प्रभाग पाण्यामुळे वैतागलाचंद्रपूर : स्मार्ट सिटीचे लोन सर्वत्र पसरलेयं. चंद्रपूरकरांनाही चंद्रपूर स्मार्ट सिटी झालेले हवंय. मात्र येथील अनेक प्रभागातील मूलभूत समस्याच अजून सुटू शकल्या नाहीत. एमईएल प्रभागात बहुप्रतीक्षेनंतर आता कुठे रस्ते होऊ लागले आहेत. मात्र इतर समस्या मनपा होऊन चार वर्ष होऊनही सुटल्या नाहीत. पिण्याचे पाणी, नाल्या आणि घरात शिरणारे नाल्यातील पाणी, यामुळे आम्ही पार वैतागलो आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी ‘लोकमत’ जवळ व्यक्त केली.चंद्रपुरातील प्रत्येक वॉर्ड स्मार्ट सिटीत यावा. तो वॉर्डही ‘स्मार्ट’ व्हावा, अशी चंद्रपुरातील प्रत्येक नागरिकांसोबतच ‘लोकमत’चीदेखील इच्छा आहे. मात्र यासाठी विकासाची गती कुठे आणि कितपत वाढवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी लोकमतने प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे ठरविले आहे. सात हजार मतदार आणि सुमारे पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या येथील एमईएल प्रभागात ‘लोकमत चमू’ शनिवारी सकाळी दाखल झाली. यावेळी नागरिकांनी अत्यंत तळमळीने ‘लोकमत’जवळ आपल्या समस्या मांडल्या. नव्हेतर समस्यांचा पाढाच वाचला. एमईएल प्रभागातील संजयनगरमधील रेल्वे क्रासींगजवळ मोठ्या संख्येने नागरिकांची घरे आहेत. मात्र या ठिकाणी रस्ता सोडला तर उर्वरित सर्वच समस्या वर्षानुवर्षापासून जैसे थेच आहेत. या परिसरात सर्वात मोठी समस्या पिण्याच्या पाण्याची आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी या ठिकाणी पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन टाकण्यात आली. ही पाईप लाईन आता अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. या लिकेजमध्ये चक्क नाल्यांचे पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांच्या घरी भरमसाठ शुल्क भरूनही नळातून नालीतील काळे पाणी येते. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील शालू बरडे या महिलेने सांगितले की आठवड्यातून केवळ दोनदा नळ येते. नाल्यांची सफाई तर महिनोमहिने केली जात नाही. त्यामुळे नाल्यांमधून दुर्गंधी येत असते. पंकज जवादे म्हणाले, नाल्यांची सफाई नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच परिसरातील कल्पना मिलिंद उराडे या महिलेने तर विजेबाबत चांगलाच रोष व्यक्त केला. वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे अनेक कामे प्रभावित होत असल्याचे त्या म्हणाल्या.एमईएल प्रभागात काही ठिकाणी रस्ते तयार करण्यात येत असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न कायम असल्याचे जाणवले. काही ठिकाणी अजूनही कच्चे आणि खड्डेयुक्त रस्ते आहेत. या प्रभागातील सावित्रीबाई फुले चौकातही पाणी, नाल्या व काही ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या या नाल्या आत्या मोडकडीस आल्या आहेत. लोकमत चमू प्रभागातील केरला कॉलनीत गेली, तेव्हा नागरिकांनी, विशेषत: महिलांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या लोकमतजवळ मांडल्या. केरला कॉलनीत नाल्या तुटलेल्या आहेत, नाल्याची सफाईदेखील वर्षभर केली जात नाही, सार्वजनिक नळ नाही, हातपंप नाही, त्यामुळे पाण्याची समस्या नेहमीच जाणवते, पथदिवे नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य असते, मोठ्या नाल्याचे पाणी घरात शिरते, असा समस्यांचा पाढाच प्रिया फसादे, मंदा त्रिकोंडवार व आणखी दहाबारा महिलांनी लोकमतपुढे वाचला. (लोकमत चमू)