शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

विंजासन येथील ऐतिहासिक बुद्धलेणी

By admin | Updated: May 4, 2015 01:22 IST

बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे.

सचिन सरपटवार  भद्रावतीबौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर १० एकरवर व्यापला आहे. त्यात पाच एकर जमिनीवर टेकडी वसलेली आहे. २५०० हजार वर्षांपूर्वीची ही लेणी असून भिक्खू सागत नावाच्या स्थवीराच्या निमंत्रणावरून भगवान गौतम बुद्ध या ठिकाणी येऊन गेले व इथूनच ते अंबतिथ्यकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात. ही बुद्ध गुंफा दोन भागात खोदण्यात आली असून पहिल्या भागात सभागार व शून्यागार कोरण्यात आले आहे. नंतर राजा हर्षवर्धनाच्या काळात बुद्ध मूर्ती कोरण्यात आली. भद्रावतीच्या दक्षिण-पश्चिम दिशेला विंजासनच्या टेकडीत बुद्धगुहा आहे. या टेकडीत ७१ फूट अंतरावर लांब सज्जा काढलेला आहे. येथे एकूण तीन गुंफा असून पहिल्या गुंफेची लांबी ७४ फूट व रूंदी २० फूट आहे. यामध्ये गौतम बुद्धांची ध्यानमुद्रेत कोरलेली मूर्ती ११ फूट तीन इंचाची असून रंग तांबूस आहे. दुसरी गुंफा ४७ फूट लांब असून २० फूट रुंद आहे. यामध्ये सात फूट एक इंच आकाराची असलेली बुद्धांची मूर्ती आहे, तर तिसरी गुंफा ३५ फूट लांब असून मूर्ती ८ फूट चार इंच इतकी आहे. विंजासन या नावाचा अपभ्रंश करण्यात येऊन या गुहेला विजासन म्हटले जाते. पूर्वी या गुहा विद्येचे आसन होत्या. या बौद्ध भिक्खूंना विद्या दिली जाते. बौद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.संतराम बी.ए. यांचे शशीम प्रश्न व भद्रावतीची प्राचीन बौद्ध संस्कृती यातील साम्य हा आकर्षणाचा विषय होता. ‘शशीम प्रश्न’ या पुस्तकातील वर्णनानुसार बौद्ध साम्राज्ये व बौद्ध संस्कृतीचा विध्वंस सुरू झाला तेव्हा विदर्भातील एक बौद्ध भिक्खू सुमेध या संकटाची बातमी बौद्ध राजांना देण्यासाठी निघाले. ते भद्रावती राज्याच्या सीमेपर्यंत आले. तेव्हा अंधार पडला होता. ते फार थकलेले होते. त्यामुळे त्यांनी सीमेवरील पहाडावरच विश्रांती घेतली.दुसऱ्या दिवशी त्यांनी तेथील नागवंशीय बौध्द राजा भद्रशील यांची भेट घेवून सर्व वृत्तांत सांगितला. राजाचा महाल एका परकोटात असून आत दगडांनी बांधलेली पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीतून पश्चिमेस एक भुयारी मार्ग आहे. तेथे एका पहाडातील प्रशस्त दालनात तथागत बुध्दांची सुवर्णाची प्रतिमा असून सुवर्ण पत्रात धम्म ग्रंथ ठेवले आहेत. सकाळी याच मार्गाने परतल्यानंतर राजाने या बौद्ध संस्कृतीचा कुणी विध्वंस करू नये व पुढे बौद्ध जनांनी त्याचे संशोधन करून जतन करावे, या हेतूने ते भुयारी द्वार विटांचे बांधकाम करून बंद करून घेतले. आजही या विहिरीच्या आतील पश्चिमेकडील एकच भिंत विटांनी बांधून असलेली आढळून येते. भन्ते सुरेई ससाई यांना घेऊन विंजासन लेणीची पाहणी केली. तेव्हा या लेणीत पूर्व-उत्तर व दक्षिण मुखी तीन द्वार असून आत तीन मोठी दालने व पहाडात कोरलेल्या तथागत बुद्धांच्या तीन भव्य प्रतिमा असल्याचे आढळून आले.त्यावेळी लेणी परिसर व इतरही ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे भग्नावशेष आढळून येत असत. परंतु आता अनेक स्थळे ओस पडली आहेत. अनेक स्थळांचे मूळ रूप नष्ट करण्यात आले आहे. या सर्व स्थळांचे निरपेक्ष भावनेने संशोधन, उत्खनन व जतन होण्याची आवश्यकता असल्याचे समाजबांधवांचे म्हणणे आहे. संशोधन झाल्यास अनेक ऐतिहासिक बाबींचा अभ्यास करणे सोईचे होणार आहे.