लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन जि. प. शिक्षण विभागाने केले. मात्र जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन’उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणार कसे, यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप नियोजन करण्यात आले नाही.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन शासनाच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या ४० टक्के विद्यार्थ्यांकडे किंवा त्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही. त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा यंदाचे शैक्षणिक वर्षे वाया जावू शकते, अशी भीती पालक व समुपदेशक श्रीकांत चांदेकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात स्मार्टफोन नसलेल्या इयत्ता पहिली ते सातवीमधील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे नियोजन जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत अद्याप करण्यात आले नाही. त्यामुळे या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग केव्हा नियोजन करणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शिक्षकांची मदतऑनलाईन शिक्षण हे एकांगी असते. हे स्पष्ट झाल्याने प्रयोगशील शिक्षकांची मदत घेणे सुरू आहे. अंमलबजावणी होईलच, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.