शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

महामार्गाचे बांधकाम ठरले शेतकऱ्यांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे.

ठळक मुद्देरस्त्याची धूळ पांढºया सोन्यावर : ढिसाळ नियोजनाचा दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : उमरेड- चिमूर- वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गालगत असणाऱ्या शेती असणाºया शेतकºयांच्या शेतातील उभ्या पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने या धुळीने काळवंडत आहे. पावसाळ्याच्या काळात या महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याची ओरड ऐकायला मिळाली होती. सुरुवातीच्या काळापासून ढिसाळ नियोजनामुळे या महामार्गाचे काम शेतकऱ्यांना मारक ठरले आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे. यापैकी चिमूर-वरोरा हा मार्ग संबधित कंत्राट कंपनीने पूर्णत: खोदला आहे. या मार्गाचे कासवगतीने चौपदरीकरण सुरु आहे. वाहतुकीकरिता या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावरून मोठया प्रमाणात भरघाव वेगाने जडवाहनांची वाहतूक होत आहे. संबधित कंत्राट कंपनी या मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा करीत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. या मार्गालगतचे बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असल्याने ही धूळ शेतातील पांढऱ्या सोन्यावर बसत आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्याच्या काळात खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली या गावातील महामागार्लागतच्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीच्या चुकीमुळे उभ्या पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. याचा फटका शेतकºयांना बसला असून त्यांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. आता तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या कापूस पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने उडणारी धूळ बसत आहे. प्रत खराब झालेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी संतापले आहेत.नुकसान भरपाईची मागणीकंत्राट कंपनीच्या दुर्लक्षाने महामार्गालगतच्या अनेक पिकावर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रसासनाने या नुकसानीचा तातडीने सर्व्ह करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.अपघाताचे सत्र सुरूचमार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षीपासून सुरू आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता बांधकामासाठी गिट्टी व मुरूम ठिकठिकाणी टाकले असून मार्गावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. वाहन चालविताना संतुलन बिघडून अपघात होत आहेत. जागोजागी खोदकाम करून बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात टाकून ठेवले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग