शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे बांधकाम ठरले शेतकऱ्यांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे.

ठळक मुद्देरस्त्याची धूळ पांढºया सोन्यावर : ढिसाळ नियोजनाचा दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : उमरेड- चिमूर- वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. कंत्राट कंपनीच्या दुर्लक्षामुळे या मार्गालगत असणाऱ्या शेती असणाºया शेतकºयांच्या शेतातील उभ्या पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने धूळ बसत आहे. यात कापूस उत्पादकांची संख्या अधिक असून पांढरे सोने या धुळीने काळवंडत आहे. पावसाळ्याच्या काळात या महामार्गाच्या कामाने परिसरातील वहानगाव व बोथली शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याची ओरड ऐकायला मिळाली होती. सुरुवातीच्या काळापासून ढिसाळ नियोजनामुळे या महामार्गाचे काम शेतकऱ्यांना मारक ठरले आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव दुष्काळग्रस्त तालुका चिमूर व वरोरा या दोन तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ (ई) या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. एस. एम.एस.प्रायव्हेट लिमिटेड व एस. आर.के. प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपन्याकडे या महामार्गाच्या चौपदरीकरण करण्याचे काम आहे. यापैकी चिमूर-वरोरा हा मार्ग संबधित कंत्राट कंपनीने पूर्णत: खोदला आहे. या मार्गाचे कासवगतीने चौपदरीकरण सुरु आहे. वाहतुकीकरिता या ठिकाणी पर्यायी मार्ग तयार करण्यात आला. या पर्यायी मार्गावरून मोठया प्रमाणात भरघाव वेगाने जडवाहनांची वाहतूक होत आहे. संबधित कंत्राट कंपनी या मार्गावर नाममात्र पाणी मारण्याचा देखावा करीत असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावरील उडणारी धूळ लगतच्या शेतातील पिकांवर बसत आहे. या मार्गालगतचे बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक असल्याने ही धूळ शेतातील पांढऱ्या सोन्यावर बसत आहे. यामुळे शेतकऱ्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. पावसाळ्याच्या काळात खडसंगी परिसरातील वहानगाव व बोथली या गावातील महामागार्लागतच्या शेतकऱ्याच्या शेतात कंपनीच्या चुकीमुळे उभ्या पिकात मोठया प्रमाणात पाणी साचले होते. याचा फटका शेतकºयांना बसला असून त्यांचे पीक पूर्णत: नष्ट झाले. आता तर मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या कापूस पिकावर मोठया प्रमाणात वाहतुकीने उडणारी धूळ बसत आहे. प्रत खराब झालेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळणार नसल्याने शेतकरी संतापले आहेत.नुकसान भरपाईची मागणीकंत्राट कंपनीच्या दुर्लक्षाने महामार्गालगतच्या अनेक पिकावर धूळ बसली आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून प्रसासनाने या नुकसानीचा तातडीने सर्व्ह करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.अपघाताचे सत्र सुरूचमार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम मागील वर्षीपासून सुरू आहे. परिणामी या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता बांधकामासाठी गिट्टी व मुरूम ठिकठिकाणी टाकले असून मार्गावर सर्वत्र गिट्टी पसरली आहे. वाहन चालविताना संतुलन बिघडून अपघात होत आहेत. जागोजागी खोदकाम करून बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त स्वरूपात टाकून ठेवले आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग