शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

आवास योजनेत चंद्रपूर महाराष्ट्रात अव्वल ठरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:46 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : २१ विभागांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या विविध योजनेतून सर्वाधिक घरे जनतेला मिळेल, यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या योजनेच्या अंमलबजावणी व पाठपुराव्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कोणत्याही परिस्थितीत आवास योजनेमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक घरे बांधणारा जिल्हा झाला पाहिजे, यासाठी कामाला लागावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये पालकमंत्री यांच्या नेतृत्वात २१ विविध विभागांवर बुधवारी चर्चा करण्यात आली. दुपारी १२ वाजता या चर्चेला सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेवर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीत बोलताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शहरे उत्तमरित्या पुढील काळात उभी राहावीत, यासाठी या आवास योजनेचा कल्पकतेने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.या बैठकीला आमदार नाना श्यामकुळे, आ. अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त संजय काकडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, स्थाई समितीचे सभापती राहुल पावडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.सकाळच्या सत्रात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) याबाबत आढावा घेताना त्यांनी आमदार नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे व मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी चर्चा केली. शहरात मोठ्या प्रमाणात आवास योजनेतून घरे देताना नदीच्या पात्रातील नागरिकांचेदेखील पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या जागेत घरे देण्यासाठी असणाऱ्या अडचणी व त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यासंदर्भात लवकरच बैठक घेत असल्याचेसुद्धा सांगितले. याशिवाय कोणते आरक्षण हटवता येते या संदर्भातही अभ्यास करण्याबाबत अधिकाºयांना निर्देश दिले.कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करापोलीस सारथी योजनेचा आढावाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. जिल्हाभरात शाळा-कॉलेजेमध्ये योग्य पद्धतीचा संदेश सर्वांना जाईल, अशी प्रचार यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले.गरज भासल्यास कॉल सेंटर आणखी उघडण्यात यावे, यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांच्या सुरक्षा संदर्भात अतिशय काटेकोरपणे या योजनेची अंमलबजावणी व्हावी, असे यावेळी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांना सांगितले. शहरातील काही भागांमध्ये असामाजिक तत्त्वांचा टोळ्या स्टंटबाजी करण्यामध्ये सक्रिय झाल्याचे यावेळी अनेक समितीच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावर अशा घटकांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.