शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना दिलासा ! मोबदल्याशिवाय जमीन ताब्यात घेण्यास मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:58 IST

Chandrapur : बांधकाम विभागाने काजळसर परिसरातील शेतकऱ्यांची जमीन घेतली होती ताब्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सार्वजनिक बांधकाम विभागाने बळजबरीने तालुक्यातील काजळसर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीला सरकारी जमीन भासवून त्यातून रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जमिनीचे शेतकरीच मालक आहे, त्यांना आधी मोबदला देऊन जमीन घ्या, असा आदेश दिला. या आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

चिमूर तालुक्यात काम्पा ते मोटेगाव जिल्हामार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. २०२० मध्ये या कामाचे कंत्राट कंपनीला दिले. बांधकाम विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातून हा प्रमुख जिल्हामार्ग तयार करण्याकरिता सीमांकन केले. शेतात खोदकाम करणे सुरू केले. शेतकऱ्यांनी याला विरोध केला. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवणे सुरू झाले. मात्र, पदरी निराशाच आली. अखेर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. अॅड. भूपेश पाटील यांच्या माध्यमातून न्यायालयात धाव घेतली. दिवाणी सरकारी अभिलेखात नमूद नसलेल्या जागेवरून रस्त्याचे बांधकाम करणे म्हणजे खासगी संपत्तीवरील मालकाच्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचा अॅड. पाटील यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. उच्च न्यायालयातील मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांनी महामार्गाचे काम सुरू केल्यास ते शेतकऱ्याच्या जमिनीवरील अतिक्रमण समजले जाईल. त्याची किंमत सरकारला भरावी लागेल, असा आदेश दिला आहे.

असा झाला युक्तिवादन्यायालयाने सरकार व बांधकाम विभागाला याबाबत निर्णय घेण्याकरिता सांगितले होते. मात्र, ही जमीन खासगी नसून, सरकारची असल्याने हा महामार्ग त्याच जमिनीतून करण्यात येईल, अशी आडमुठी भूमिका सरकारी पक्षाने घेतली होती. यासंदर्भात न्यायालयाकडून बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. ४ एप्रिल २०२५ रोजी ही याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष अंतिम सुनावणीसाठी आली. शेतकऱ्यांकडून अॅड. भूपेश पाटील व सरकारकडून अॅड. दामले यांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला. त्यानंतर शेतकऱ्यांची भूमिका योग्य असल्याचा आदेश दिला. 

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर