शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

‘तिच्या’ लग्नासाठी एकवटले गाव

By admin | Updated: January 13, 2016 01:05 IST

मुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

\लोकवर्गणीतून पार पडला विवाह : विसापूरच्या पंचक्रोशीत आगळी-वेगळी घटनाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरमुलगी जन्माला आली की, आईवडिलांच्या कपाळावर आठ्या पडतात. तिच्या लग्नासाठी पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. अठराविश्वे दारिद्र्यातील कुटुंबाला अधिकच अडचणीला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी चिंता सतावत असते. मात्र चिंतामग्न असलेल्या एका गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी सारे गाव एकवटले. लोकवर्गणीतून ‘तिचा’ विवाह सोमवारी थाटात पार पडला. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विसापूरच्या पंचक्रोशीत आगळ्या-वेगळ्या विवाहाचा प्रसंग प्रेरणा देणारा ठरला आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर येथील मधुकर शिवरकर यांची मुलगी अनिता हिच्या लग्नाची ही गोष्ट आहे. चित्रपटाच्या कथानकात साजेसा प्रसंग घडला आहे. मधुकरच्या घरी पत्नी, दोन मुले व दोन मुली असे कुटुंब आहे. घरात दारिद्र्याने ३५ वर्षापूर्वीच ठाण मांडले आहे. अशातच अनिताच्या विवाहाचा प्रस्ताव आला. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील काशिनाथ घुबडे यांचे स्थळ आले. एकमेकांची पसंती झाली. लग्नाचा बेत आखण्यात आला. मात्र परिस्थिती आड येत होती. आईवडिलांना मुलीचे लग्न मोडणार तर नाही ना, ही चिंता सतावत होती. अशातच मुलीचे वडील मधुकर शिवरकर यांनी श्री पंढरीनाथ देवस्थानच्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. येथील जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी आस्थेने विचारपूस केली. मुलीकडील परिस्थिती हलाखीची होती. मात्र काशिनाथ घुबडे याचे आईवडील हयात नसल्याची बाब समोर आली. नियोजित वधू-वराचे लग्न झालेच पाहिजे, असा दृढनिश्चय करण्यात आला. या लग्न समारंभाला ऐन विवाहाच्या तीन तास अगोदर लोकवर्गणीचा मार्ग अंगिकारण्यात आला. पाहतापाहता लोकवर्गणी जमा झाली. गावकऱ्यांनी आपल्याच मुलीचे लग्न समजून गावातील सरपंच रिता जिलटे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी लग्नात हिरहिरीने भाग घेतला. यात गावकऱ्यांचा पुढाकारही लाभला. सर्वांचा हातभार लागत असल्याचे पाहून मुलीकडचे पाहुणेही सद्गतीत झाले. वधूच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. लोकवर्गणीतून पार पडलेल्या विवाह सोहळ्याला समाधानाची सोनेरी किरण लाभली. एखाद्या चांगल्या व श्रीमंत कुटुंबातील लग्नाला लाजविणारा अनिताचा विवाह झाला. तिला निरोप देताना विवाहाला उपस्थितीत असलेले सारेजण हजर होते. एका गरीब मुलीच्या सुखी संसारासाठी आपला हातभार लागला. याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होते.विशेष म्हणजे एकेकाळी मधुकर शिवरकर यांची विसापुरात एकमेव पान टपरी होती. २५ वर्षापूर्वी त्याच्या टपरीवरच वर्तमानपत्र वाचले जात होते. विड्याचे पान बनविण्यात त्याचा हातखंडा होता. त्याच्या पान टपरीवर पान खाणाऱ्यांची गर्दी व्हायची. त्याच व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र उधारीमुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले. परिस्थितीचे दृष्टचक्र ओढवले. सढळ हाताने मदत करणाऱ्यांवर याचना करण्याची वेळ आली. तरीही माणुसकी जिवंत असल्याचा पुरावाच विसापूरकरांनी दिला आहे. पंचक्रोशीत हा प्रसंग दिर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला आहे.