शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

पोळ्याची मारबत उठतेयं पळसाच्या जीवावर

By admin | Updated: September 9, 2015 00:56 IST

‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत ...

पळस संवर्धनासाठी आवाहन : सार्ड, श्रीसंगम, ज्ञानरंजनची जनतेला सादगोपालकृष्ण मांडवकर  चंद्रपूर‘माशा मुरकुटे घेवून जा गे मारबत’ म्हणत तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पळसाच्या फांद्या गावाच्या सीमेबाहेर नेवून मारबत काढण्याची पूर्वापार परंपरा विदर्भात असली तरी, या परंपरेपायी लक्षावधी पळसांची होणारी कत्तल मात्र निसर्गाच्या दृष्टीने धोकादायक ठरली आहे. हजारो पक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी बहुपयोगी असलेल्या या पळसाच्या संवर्धनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.सार्ड (सोशल अ‍ॅक्शन फॉर रूरल डेव्हलपमेंट), श्रीसंगम (श्री संत गमाजी महाराज विकास मंडळ, नंदोरी), ज्ञानरंजन चंदनखेडा या सामाजिक संस्थांसह चंद्रपूर वनविभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून या विषयावर जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.या जनजागृतीचा एक भाग म्हणून या संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन ‘पळस बचाव अभियान’ उभारले आहे. या अंतर्गत नागरिकांच्या जनजागरणासाठी पत्रके प्रकाशित करून ती नागरिकांना वाटली जात आहेत. या सोबतच, ग्रामीण भागात गावकऱ्यांच्या सभा आयोजित करून पळसाची उपयोगिता पटवून दिली जात असून संवर्धनासाठी आवाहन केले जात आहे.विदर्भातील ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी सकाळी दारासमोर पळसाच्या फांद्या ठेवण्याची परंपरा आहे. या फाद्यांना वाक बांधून गृहिणीकडून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळ्याच्या दिवशी भल्या पहाटेलाच त्या पळसाच्या सर्व फांद्या उचलून ‘मारबत’ काढण्याची परंपरा आहे. ही मारबत काढणे म्हणजे ‘माश्या मुरकुटे घेऊन जा गे मारबत’ असे मोठ्याने ओरडण्याचा प्रकार असतो. त्या फांद्या एकमेकाएंवर ठोकत आणि ‘घेऊन जा गे मारबर’ म्हणत गावसीमेबाहेर अथवा परसदारातील खतावर त्या फांद्या नेवून फेकण्याची परंपरा आहे. आताच्या नव्या युगातही घराघरातून ही मारबत काढली जाते, मात्र त्यामागचे कारण कुणालाही माहीत नाही. तरीही परंपरेचा भाग म्हणून आजही या दिवशी पळसाच्या फांद्या आणून दारात ठेवल्या जातात. एका घरी साधारणत: आठ ते दहा फांद्या वापरल्या जातात. या हिशेबाने प्रत्येक कुटूंबात आणल्या जाणाऱ्या फांद्यांची संख्या गणली तर हा आकडा लक्षावधी झाडांवर संक्रांत आणणारा असल्याचे दिसेल. या परंपरेचा फायदा घेऊन शहरात तर अनेक जण ट्रॉली भरभरून पळसाच्या फांद्या आणतात आणि त्यांचा व्यापार करतात. नागरिकही परंपरेचे पालन करायला हवे म्हणून फांद्या विकत घेवून घरोघरी नेतात.