शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात पुन्हा हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:15 IST

रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : वाहन अडवून ठोठावला जातोय दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखा ते बंगाली कॅम्पकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील सावरकर चौकात वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकांना अडवून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना थेट दंड ठोठावणे सुरू केले. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.या आधी चार महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी एका रात्री हेल्मेट सक्तीचा आदेश काढला. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांची प्रचंड तारांबळ झाली. दंड ठोठावला जात असल्याने ठिकठिकाणी हेल्मेट विक्री करणाºयांचे स्टॉल लागले. मात्र नागरिकांकडून टिकेची झोड उठताच हेल्मेट सक्ती गुंडाळण्यात आली. त्याच दरम्यान नियती ठाकर यांची बदली झाल्यामुळे हेल्मेट सक्तीला अल्पविराम मिळाला होता. आता पुन्हा चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून हेल्मेट सक्ती केली जात आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अभ्यासात रस्ते अपघातात महाराष्ट्र अग्रेसर असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना फटकारले. परिणामी मुख्य सचिवांनी अल्पावधीत रस्ते अपघात कमी करण्यावर धोरण निश्चित केले जाईल, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सर्वाधिक रस्ते अपघात हे दुचाकी चालकांचे होतात. हेल्मेटअभावी अपघातामुळे दुचाकी चालकांचा मृत्यू होत असल्याची बाब या अभ्यासात निदर्शनास आली होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले. गेल्या महिन्यात रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश मिळताच आता पोलीस आणि परिवहन विभाग सक्रीय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती करण्यात येवू नये, असे सुरुवातीला आदेश होते. आता मात्र, हा आदेश उठविण्यात आला आहे. हेल्मेट सक्ती वाहनचालकाच्या हिताची असली तरी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती न करता आणि पूर्वसूचना न देता थेट दंड ठोठावला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वाहतूक निरीक्षक विलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेल्मेट सक्ती कधीच बंद नव्हती. यापूर्वी बाहेरगावावरून शहरात येणाºयांवर कारवाई सुरूच होती. आता शहरातही हेल्मेटसंदर्भात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस