शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

चंद्रपुरात पुन्हा हेल्मेटसक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:15 IST

रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये संताप : वाहन अडवून ठोठावला जातोय दंड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्ता सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही हेल्मेटसक्ती करण्याचा प्रकार या आधी झाला असून आता पुन्हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे बुधवारपासून चंद्रपुरात हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखा ते बंगाली कॅम्पकडे जाणाºया राष्ट्रीय महामार्गावरील सावरकर चौकात वाहतूक पोलिसांनी दुचाकी चालकांना अडवून हेल्मेट नसलेल्या वाहनधारकांना थेट दंड ठोठावणे सुरू केले. त्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.या आधी चार महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी एका रात्री हेल्मेट सक्तीचा आदेश काढला. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांची प्रचंड तारांबळ झाली. दंड ठोठावला जात असल्याने ठिकठिकाणी हेल्मेट विक्री करणाºयांचे स्टॉल लागले. मात्र नागरिकांकडून टिकेची झोड उठताच हेल्मेट सक्ती गुंडाळण्यात आली. त्याच दरम्यान नियती ठाकर यांची बदली झाल्यामुळे हेल्मेट सक्तीला अल्पविराम मिळाला होता. आता पुन्हा चंद्रपूर येथील पोलीस विभागाकडून हेल्मेट सक्ती केली जात आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार रस्ते अपघातांचा अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अभ्यासात रस्ते अपघातात महाराष्ट्र अग्रेसर असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना फटकारले. परिणामी मुख्य सचिवांनी अल्पावधीत रस्ते अपघात कमी करण्यावर धोरण निश्चित केले जाईल, असे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सर्वाधिक रस्ते अपघात हे दुचाकी चालकांचे होतात. हेल्मेटअभावी अपघातामुळे दुचाकी चालकांचा मृत्यू होत असल्याची बाब या अभ्यासात निदर्शनास आली होती. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले. गेल्या महिन्यात रस्ते अपघात नियंत्रणात आणण्याचे आदेश मिळताच आता पोलीस आणि परिवहन विभाग सक्रीय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हेल्मेट सक्ती सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती करण्यात येवू नये, असे सुरुवातीला आदेश होते. आता मात्र, हा आदेश उठविण्यात आला आहे. हेल्मेट सक्ती वाहनचालकाच्या हिताची असली तरी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती न करता आणि पूर्वसूचना न देता थेट दंड ठोठावला जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वाहतूक निरीक्षक विलास चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेल्मेट सक्ती कधीच बंद नव्हती. यापूर्वी बाहेरगावावरून शहरात येणाºयांवर कारवाई सुरूच होती. आता शहरातही हेल्मेटसंदर्भात दंडात्मक कारवाई केली जात आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस