शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

दीपक साबने जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात ...

दीपक साबने

जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध जातात. मात्र, त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, सध्या ही यंत्रणादेखील नॉट रिचेबल झाली आहे.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध संघटनेच्या माध्यमातून तक्रार करूनही आरोग्य, शिक्षण, दळणवळण, विद्युत पुरवठा, शेती कर्ज अशा नानाविध समस्यांनी जिवती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था जिवती तालुक्याची झाली आहे. विविध समस्यांकडे शासनाचा कानाडोळा आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

मागील पंचवार्षिकमध्ये हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा ही जिल्ह्यातील कुठल्याही समस्येचे तक्रार निवारण करण्यासाठी उदयास आली होती. सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्य करीत होती. आपल्या समस्या सामान्य जनतेला मांडण्यासाठी १८००- २६६-४४०१ टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध होती. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून अनेक समस्यांचे निवारणदेखील करण्यात आले. मात्र, आजघडीला जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासला आहे. समस्येविषयी तक्रारी करूनदेखील त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून बघितला असता सध्या हॅलो चांदा नॉट रिचेबल अवस्थेत आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठीची यंत्रणाच आता वेगळी समस्या झाली आहे.

बॉक्स

यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज

हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईल काय किंवा त्याच धर्तीवर दुसरी यंत्रणा सुरू होईल काय, नागरिकांच्या समस्या सुटतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक समस्या घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्य नाही. त्यामुुळे हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.