शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

दीपक साबने जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात ...

दीपक साबने

जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध जातात. मात्र, त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, सध्या ही यंत्रणादेखील नॉट रिचेबल झाली आहे.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध संघटनेच्या माध्यमातून तक्रार करूनही आरोग्य, शिक्षण, दळणवळण, विद्युत पुरवठा, शेती कर्ज अशा नानाविध समस्यांनी जिवती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था जिवती तालुक्याची झाली आहे. विविध समस्यांकडे शासनाचा कानाडोळा आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

मागील पंचवार्षिकमध्ये हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा ही जिल्ह्यातील कुठल्याही समस्येचे तक्रार निवारण करण्यासाठी उदयास आली होती. सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्य करीत होती. आपल्या समस्या सामान्य जनतेला मांडण्यासाठी १८००- २६६-४४०१ टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध होती. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून अनेक समस्यांचे निवारणदेखील करण्यात आले. मात्र, आजघडीला जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासला आहे. समस्येविषयी तक्रारी करूनदेखील त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून बघितला असता सध्या हॅलो चांदा नॉट रिचेबल अवस्थेत आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठीची यंत्रणाच आता वेगळी समस्या झाली आहे.

बॉक्स

यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज

हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईल काय किंवा त्याच धर्तीवर दुसरी यंत्रणा सुरू होईल काय, नागरिकांच्या समस्या सुटतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक समस्या घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्य नाही. त्यामुुळे हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.