शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:28 IST

दीपक साबने जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात ...

दीपक साबने

जिवती : जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासलेला तालुका आहे. तालुक्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालये आहेत. त्या कार्यालयात आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी, महिला, वृद्ध जातात. मात्र, त्यांच्या समस्यांचे निराकरण होत नाही. कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, सध्या ही यंत्रणादेखील नॉट रिचेबल झाली आहे.

शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध संघटनेच्या माध्यमातून तक्रार करूनही आरोग्य, शिक्षण, दळणवळण, विद्युत पुरवठा, शेती कर्ज अशा नानाविध समस्यांनी जिवती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. शासकीय काम अन बारा महिने थांब अशीच अवस्था जिवती तालुक्याची झाली आहे. विविध समस्यांकडे शासनाचा कानाडोळा आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.

मागील पंचवार्षिकमध्ये हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा ही जिल्ह्यातील कुठल्याही समस्येचे तक्रार निवारण करण्यासाठी उदयास आली होती. सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन व जनता यामधील दुवा म्हणून हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा कार्य करीत होती. आपल्या समस्या सामान्य जनतेला मांडण्यासाठी १८००- २६६-४४०१ टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध होती. या टोल फ्री क्रमांकाचा वापर करून अनेक समस्यांचे निवारणदेखील करण्यात आले. मात्र, आजघडीला जिवती तालुका हा विविध समस्यांनी ग्रासला आहे. समस्येविषयी तक्रारी करूनदेखील त्यावर उपाययोजना होताना दिसत नाही. हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून बघितला असता सध्या हॅलो चांदा नॉट रिचेबल अवस्थेत आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठीची यंत्रणाच आता वेगळी समस्या झाली आहे.

बॉक्स

यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज

हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा सुरू होईल काय किंवा त्याच धर्तीवर दुसरी यंत्रणा सुरू होईल काय, नागरिकांच्या समस्या सुटतील काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक समस्या घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविणे शक्य नाही. त्यामुुळे हॅलो चांदा तक्रार निवारण यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.