शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकावरील विविध रोगाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 22, 2015 00:48 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची ...

निसर्गाचा लहरीपणा भोवला : महागड्या औषधांचा खर्च व्यर्थपोंभुर्णा : यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धान पिकावर अचानक विविध रोगाचे आक्रमण झाल्याने परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यासमोर धानपिक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.पोंभुर्णा तालुक्यामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही पारंपरिक व्यवसायावर निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. तरी पण कसेबसे शेतकऱ्यांनी घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक हातात येणार असल्याचे स्वप्न बघत होते. परंतु अचानक धानपिकावर कडपा, कडाकरपा, पांढरा रोग, मावा, तुडतुडा व इतर विविध रोगांनी आक्रमण केले असल्याने आता धानपीक निघूनही शेतकऱ्यांना हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती परिसरामध्ये निर्माण झाली आहे.रोवणी केलेल्या पिकाला रोगराईपासून बचाव करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशक औषधीचा वापर करीत आहे. त्यासाठी खाजगी दुकानातून औषधी विकत घेताना महागड्या औषधांचा आर्थिक भुर्दंडसुद्धा सोसावा लागत आहे. एवढे करून धानपिकावरील रोग पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सिंचनाची सोय नसल्याने वायसर नावाच्या मध्यम प्रतिच्या धानाची लागवड केली असून या धानपिकास शेवटच्या एका पाण्याची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा शेततलावाची सोय आहे त्यांचे धानपीक काही प्रमाणात तग धरुन आहेत. तर ज्यांचेकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांचे धानपीक सुकून त्याचे तणसात रूपांतर होत आहे. दरवर्षी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच स्वत:चे दोन वेळचे जेवण कठीण होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय असल्याने आणि दुसरे कुठले साधन नसल्याने त्यांना या व्यवसायावर अवलंबून राहावे लागत आहे आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून आर्थिक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)