शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

धान पिकावरील विविध रोगाने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: October 22, 2015 00:48 IST

यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची ...

निसर्गाचा लहरीपणा भोवला : महागड्या औषधांचा खर्च व्यर्थपोंभुर्णा : यावर्षी पावसाने दगा दिल्यावरही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी केली. एवढे करून हातामध्ये काहीतरी येणार असल्याची आशा बाळगून असतानाच धान पिकावर अचानक विविध रोगाचे आक्रमण झाल्याने परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. निसर्गाने पुन्हा शेतकऱ्यांना झोडपून काढले असून डोळ्यासमोर धानपिक खराब होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.पोंभुर्णा तालुक्यामध्ये शेती हाच मुख्य व्यवसाय असून मोठ्या प्रमाणात शेतकरी आजही पारंपरिक व्यवसायावर निर्भर आहेत. यंदा मात्र पावसाने चांगलीच खेळी केली. तरी पण कसेबसे शेतकऱ्यांनी घाम गाळून रोवणी करून धानाचे पीक हातात येणार असल्याचे स्वप्न बघत होते. परंतु अचानक धानपिकावर कडपा, कडाकरपा, पांढरा रोग, मावा, तुडतुडा व इतर विविध रोगांनी आक्रमण केले असल्याने आता धानपीक निघूनही शेतकऱ्यांना हाती काहीच लागणार नसल्याची स्थिती परिसरामध्ये निर्माण झाली आहे.रोवणी केलेल्या पिकाला रोगराईपासून बचाव करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशक औषधीचा वापर करीत आहे. त्यासाठी खाजगी दुकानातून औषधी विकत घेताना महागड्या औषधांचा आर्थिक भुर्दंडसुद्धा सोसावा लागत आहे. एवढे करून धानपिकावरील रोग पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे.विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे सिंचनाची सोय नसल्याने वायसर नावाच्या मध्यम प्रतिच्या धानाची लागवड केली असून या धानपिकास शेवटच्या एका पाण्याची गरज असतानाच निसर्गाने दगा दिला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर किंवा शेततलावाची सोय आहे त्यांचे धानपीक काही प्रमाणात तग धरुन आहेत. तर ज्यांचेकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांचे धानपीक सुकून त्याचे तणसात रूपांतर होत आहे. दरवर्षी कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना तालुक्यातील शेतकरी अनेक वर्षापासून करीत आहे. जगाचे पोट भरत असताना मात्र त्यालाच स्वत:चे दोन वेळचे जेवण कठीण होत आहे, अशा परिस्थितीमध्ये शेती करणे परवडणारे राहिलेले नाही. मात्र वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय असल्याने आणि दुसरे कुठले साधन नसल्याने त्यांना या व्यवसायावर अवलंबून राहावे लागत आहे आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. त्यामुळे तालुका स्तरावरील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी करून आर्थिक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)