शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता पुराची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST

जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देजिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरु केली तयारी ; तालुकास्तरावरही पथकांचे केले गठन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे भविष्यात पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व तयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बैठक तसेच विभागनिहाय सूचना जारी केल्या असून विभाग संभाव्य पुरपरिस्थितीसोबत लढण्यास सज्ज आहे.जिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्यांसह इरई, झरपट आदी नद्या वाहतात. त्यामुळे नदी काठावरील गावांना दरवर्षीच धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे, इरई धरण भरल्यानंतर पाणी सोडल्यास चंद्रपूर शहरासह अन्य गावांमध्येही पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाने पूर्व तयारी सुरु केली असून संभाव्य पुरपरिस्थितीच्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासंदर्भात संबंधित विभागांना तशा सूचना जारी करण्यात आल्या आहे. पूर आल्यास कोणत्या उपाययोजना करावयाच्या यासंदर्भात आराखडाही तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून त्यातील पोट कलम २ नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. यानुसार त्यांनी सर्व संबंधित अधिकारी तसेच विभाग प्रमुखांना मान्सूनपूर्व तयारीची सर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तालुकास्तरावर तसेच महापालिका, नगरपरिषदांनाही सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

पूरबाधित क्षेत्रजिल्ह्यात वर्धा, वैनगंगा या नद्यांसह इरई, झरपट या नद्या आहेत. या नद्यांतील क्षेत्रामध्ये काही गावांना पुराचा फटका बसतो. तर इरई धरणालगत असलेल्या गावांसह चंद्रपूर शहरालाही पुराचा फटका बसतो. यासोबतच राजुरा, नागभीड, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील गावांना पुराचा धोका असतो.

चंद्रपूर शहरात १०१ इमारती धोकादायकपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील इमारतींचे महापालिकेने सर्व्हेक्षण केले असून शहरातील ३ झोनमध्ये १०१ इमारती धोकादायक आहे. त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात झोननिहाय उपायुक्त धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील यांच्या आदेशानुसार धोकादायक इमारत मालकांना नोटीस पाठविण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी या इमारती सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

अग्नीशमन दलात रिक्त पदांचे ग्रहणजिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, महानगरपालिका अग्णीशमन दल, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर पंचायती सज्ज आहे. असे असले तरी चंद्रपूर अग्नीशमनदलात रिक्त पदाचे ग्रहण आहे. अनेक पदे रिक्त असल्यामुळे येथील कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. पोलीस विभाग, उपविभागीय कार्यालय तसचे तहसील कार्यालयामंध्ये विविध पथकांचे गठण करण्यात आले आले असून बचाव व साहित्य उपलब्ध करून दिले

मान्सून पूर्व तयारीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयारी केली आहे. तालुका, नगरपरिषद विभागांना सूचना करण्यात आल्या आहे. पोलीस तसेच विविध विभागात पथकांचेही गठन केले आहे.-जितेश सुरवाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, चंद्रपूर

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर