शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

नऊ तालुक्यांतील अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

बॉक्स चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, ...

बॉक्स

चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग

अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, लभानसराड १०.१६३, डोंगरगाव १२७ व लाल नाला धरणातून ६३. ३४ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव, अमलनाला, पकड्डीगुडम व इरई धरणातील जलसाठ्यातही वाढ झाल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे यांनी दिली.

बॉक्स

गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरण तुडुंब भरले. पाणी पातळी कायम राखण्यासाठी ३१ दरवाजातून २२५० क्यूसेक पाणी सोडले जात होते. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरू शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून पुन्हा ४००० ते ५००० क्यूसेक्स पाणी सोडणे सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेले तालुके

जिल्ह्यात नऊ तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंद्रपूर तालुक्यात ११२.८ मिमी, बल्लारपूर १९०.६, गोंडपिपरी ७७, मूल ८३.१, सावली ७३.७, सिंदेवाही ८५.७, राजुरा १४५.६, कोरपना १४०.८ आणि जिवती तालुक्यात सर्वाधिक २००.७ मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यात पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतीची कामे ठप्प आहेत.

बाॅक्स

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सर्वेक्षणासाठी बैठका

संततधार पावसाचा सर्वाधिक फटका नऊ तालुक्यांना बसला. नाल्याच्या काठावर असलेली शेती पुराच्या पाण्याखाली बुडून आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी तालुकास्तरावर तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. पुराचे पाणी उतरताच शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

२४ तासांतील तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

चंद्रपूर ११२.८

बल्लारपूर १९०. ६

गोंडपिपरी ७७

पोंभुर्णा ८३.१

मूल ११३.४

सावली ७३.७

वरोरा ६१.६

भद्रावती ६३

चिमूर ४४

ब्रह्मपुरी २६.८

सिंदेवाही ८५.१

नागभीड ४६.४

राजुरा १४५.६

कोरपना १४०.८

जिवती २००.७

एकूण १४६५.२

सरासरी ९७.७२४