शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

नऊ तालुक्यांतील अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:17 IST

बॉक्स चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, ...

बॉक्स

चार धरणांच्या सांडव्यातून पाणी विसर्ग

अतिवृष्टीने जिल्ह्यातील चार धरणे तुडुंब भरले. शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून चंदई धरणातून २.५४६, लभानसराड १०.१६३, डोंगरगाव १२७ व लाल नाला धरणातून ६३. ३४ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव, अमलनाला, पकड्डीगुडम व इरई धरणातील जलसाठ्यातही वाढ झाल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे यांनी दिली.

बॉक्स

गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले

गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरण तुडुंब भरले. पाणी पातळी कायम राखण्यासाठी ३१ दरवाजातून २२५० क्यूसेक पाणी सोडले जात होते. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन सुरू शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून पुन्हा ४००० ते ५००० क्यूसेक्स पाणी सोडणे सुरू झाले. जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बॉक्स

अतिवृष्टी झालेले तालुके

जिल्ह्यात नऊ तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंद्रपूर तालुक्यात ११२.८ मिमी, बल्लारपूर १९०.६, गोंडपिपरी ७७, मूल ८३.१, सावली ७३.७, सिंदेवाही ८५.७, राजुरा १४५.६, कोरपना १४०.८ आणि जिवती तालुक्यात सर्वाधिक २००.७ मिमी पावसाची नोंद झाली. या तालुक्यात पाऊस सुरूच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतीची कामे ठप्प आहेत.

बाॅक्स

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर सर्वेक्षणासाठी बैठका

संततधार पावसाचा सर्वाधिक फटका नऊ तालुक्यांना बसला. नाल्याच्या काठावर असलेली शेती पुराच्या पाण्याखाली बुडून आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी व महसूल अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी तालुकास्तरावर तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. पुराचे पाणी उतरताच शनिवारपासून नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

२४ तासांतील तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)

चंद्रपूर ११२.८

बल्लारपूर १९०. ६

गोंडपिपरी ७७

पोंभुर्णा ८३.१

मूल ११३.४

सावली ७३.७

वरोरा ६१.६

भद्रावती ६३

चिमूर ४४

ब्रह्मपुरी २६.८

सिंदेवाही ८५.१

नागभीड ४६.४

राजुरा १४५.६

कोरपना १४०.८

जिवती २००.७

एकूण १४६५.२

सरासरी ९७.७२४