शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

By admin | Updated: August 19, 2015 01:18 IST

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली.

चंद्रपूर: सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि नियमित आरोग्यसेवा पुरविण्याच्या उदात्त हेतूने शासनाने दुर्गम भागात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली. मात्र या केंद्राना आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुशेषांचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्यात अशा डॉक्टरांची तब्बल ३९ पदे रिक्त असल्याने संपूर्ण जिल्हाभर आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.जिल्ह्यात आजघडीला एकूण ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन या प्रमाणे ११६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र अवघे ७७ डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचाही समावेश आहे. रिक्त असलेल्या ३९ डॉक्टरांपैकी २० जण हे पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेत. तर तीन डॉक्टरांवर विविध आरोप असल्याने त्यांना जिल्हा कार्यालयाशी संलग्न करण्यात आले.त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे डॉक्टरांच्या या अनुशेषामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. परगावाहून येणाऱ्या डॉक्टराची वाट पाहून थकल्यानंतर रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. कोरपना या आदिवासीबहुल तालुक्यात तर आरोग्य सेवेची मोठी दैनावस्था दिसून येते. या तालुक्यात नारंडा, विरुर (गाडेगाव) आणि मांडवा असे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी नारंडा येथील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याने चार महिन्यांपूर्वी राजीनामा दिला तर दुसरा वैद्यकीय अधिकारी बऱ्याच दिवसांपासून दिर्घ रजेवर आहे. त्यामुळे वनसडी येथील आयुर्वेदीक दवाखान्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडे नारंडाचा प्रभार सोपविण्यात आला. परिणामी वनसडीचे आयुर्वेदीक रुग्णालय आता कुलूप बंद अवस्थेत आहे. दुसरी बाब म्हणजे प्रभार दिल्यानंतरही त्यांच्याकडे वित्तीय अधिकार नसल्याने सुमारे अडीच महिन्यांपासून नारंडा केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन अडले आहे.मांडवा आरोग्य केंद्रातील एक डॉक्टर आरोग्य सेविकेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात अडकल्याने त्याला मुख्यालयाशी जोडण्यात आले. त्यामुळे या आरोग्य केंद्रात शुकशुकाट पसरल्याने अखेर पारडी आणि कोडशी येथील आयुर्वेदीक दवाखाने बंद करुन त्या दोघांची मांडवाला सेवा घेणे सुरु आहे. येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे जिवती तालुक्याचा आधीच प्रभार असताना आता नव्याने मांडवाचाही प्रभार देण्यात आला, तर मांडवाच्या एका डॉक्टरकडे नारंडा केंद्रातील वित्तीय अधिकारी सोपविण्यात आले. एकंदरी एकाच डॉक्टरला ५० किमी अंतरावरील दोन केंद्रात फिरस्तीवर दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र एकाच ठिकाणाहून सारे सुरु आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यात साथीचे तुरळक आजार वाढले आहेत. ही लागण अधिक उद्भवण्याची परिस्थिती असताना तालुक्यात मात्र डॉक्टरांची वाणवा प्रकर्षाने जाणवू लागली आहे. (प्रतिनिधी)