शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: February 5, 2016 00:43 IST

आदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही,....

प्रकल्प विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष : थंड पाण्याने करावी लागते आंघोळशंकर चव्हाण/ संघरक्षीत तावाडे जिवतीआदिवासी प्रकल्प विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या मुलामुलींना पुरेशा सोयी - सुविधा तर मिळत नाही, त्याचप्रमाणे गरम पाणी करण्यासाठी प्रकल्प विभागाने सोलर यंत्राचे चार संच बसविले आहे. मात्र गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून हे चारही सोलर यंत्र बंद अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना आपले आरोग्य धोक्यात घालून चक्क थंड पाण्याने आंघोळी कराव्या लागत आहे.जिवती येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असून आजघडीला २८६ पटसंख्या व २६२ निवासी विद्यार्थी वसतिगृहात राहत असले तरी स्वतंत्र्य निवासाची सोय नाही. मुलींसाठी फक्त वसतिगृहाची सोय आहे. मुलांना त्याच खोलीत शिक्षणाचे धडे व तिथेच निवासाचे कार्य करावे लागते. दर्जेदार शिक्षण व निवासाची चांगली सोय पहाडावरील आदिवासी मुलांना मिळाव्यात, यासाठी आदिवासी प्रकल्प विभागाने शासकीय आश्रमशाळेची निर्मिती केली असली तरी सोयीसुविधाअभावी आश्रमशाळा समस्यांचे माहेरघर झाले आहे.शौचालयाची दुरवस्थाआश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सोय असली तरी त्यातील दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे अर्धेअधिक विद्यार्थी बाहेरच शौचविधीसाठी जात असल्याचे कळते. शौचालयावरील छताची दयनीय अवस्था झाली आहे. त्या ठिकाणच्या विद्युत तारासुद्धा उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. हीच अवस्था स्नानगृहाची आहे. त्यामुळे काही मुले स्नानगृहाबाहेर उघडयावरच आंघोळ करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. जबाबदार कोणआश्रमशाळेतील सोयी-सुविधांअभावी होणारे हाल, निवासाचे प्रश्न, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, लाखो रुपये खर्च करुन सोलर यंत्र बसविले. पण तेही अल्पावधीतच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागते. या विविध समस्यामुळे विद्यार्थ्यांवर अनेक संकट ओढवत आहे. या प्रकाराला जबाबदार कोण?मुलीच्या वसतिगृहालगत अस्वच्छतामुली राहत असलेल्या वसतिगृहालगत व मागच्या बाजूला असलेला केरकचरा व घाणीमुळे डासांचे प्रमाण तर वाढलेच, पण साप, विंचूसारख्या प्राण्यांची भीती बाळगावी लागते. एकादी वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाला तर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. वसतिगृहात व बाहेर वरांड्यात पुरेसा प्रकाश मिळेल अशी उपकरणे तर नाहीच पण प्रकल्प विभागाकडून मिळालेले जनरेटरसुद्धा बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर आला आहे.शुद्ध पाणीही मिळत नाही शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सृदुढ व सुरक्षित रहावे, यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टरची सोय असणे आवश्यक आहे. मात्र शाळेत वॉटर फिल्टरच नसल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्यावरच तहान भागवावी लागते. त्यामुळे अनेकांना आजार जडत असल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले. असे असतानाही आजवर याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, हे येथील विद्यार्थ्यांचे दुर्दैव.