शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आरोग्य केंद्र औषधीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:44 IST

सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.

ठळक मुद्देरूग्णांना नाहक त्रास : सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.वातावरणाच्या बदलाने जिल्ह्यातील अनेक भागांत तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सध्या रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, सर्दी, ताप, खोकल्याचा औषधसाठाच केंद्रात नाही. रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकारी बळी पडत आहे. साथरोगाच्या दिवसांतच औषधे नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालआ आहे.जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ आरोग्य उपकेंद्र, नऊ फिरते पथक, १० आयुर्वेद रुग्णालये आहेत. या रुग्णालयात अनेक औषधे नाहीत. दोन वर्षांपासून औषधे पुरविण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिलेली आहे. ही कंपनी मागणीनुसार औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना करीत आहे. राज्यभरात ही कंपनी औषधांचा पुरवठा करीत आहे. आता औषधांचा पुरवठा करणे या कंपनीला जड जात असल्याचे दिसून येते.वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, उलट्या अशा आजारांनी नागरिक बेजार आहेत. त्यावरील औषधेही सध्या रूग्णांलयांमध्ये उपलब्ध नाहीत. सर्दी, खोकल्यावरील सिपीकजीन्स व सीकोडॅक्झीन ही साधी औषधेही नाहीत.तापाच्या रूग्णासाठी पॅरेसिटमेल टॅबलेटही अनेक रुग्णालयांत नाही. शरीरात पाणी टिकवून ठेवण्याचे काम करणारे ओआरएस पावडरही सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना बळी पडावे लागत आहे.क्षयरोग व उच्चदाब तपासणी बंदराज्य शासनाच्या माध्यमातून २०१२ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात क्षयरोग, उच्चदाब रुग्णांची नियमितपणे तपासणी सुरू करण्यात आली. तेव्हा आवश्यक ती औषधे देण्यात येत होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही तपासणी बंद आहे. शुगर तपासणीही बंद करण्यात आली असून तपासणी करताना आवश्यक असलेल्या ग्लुकोस्ट्रीप अनेक रुग्णालयांत उपलब्ध नाही. प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांना कॅल्शिअमच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र, त्याही अनेक रूग्णालयात उपलब्ध नाहीत.औषध पुरवठ्याचे काम मुंबईच्या हॉपकीन कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यात काही आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असेल. मात्र लवकरच ही परिस्थिती सुधारेल व रूग्णांना औषधे मिळतील.- डॉ. सतीश गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी.