शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आरोग्य केंद्र औषधीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 22:44 IST

सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.

ठळक मुद्देरूग्णांना नाहक त्रास : सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून विविध आजारात वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने जलजन्य आजाराची अनेकांना लागन होत आहे. त्यामुळे अनेकजण रूग्णालयात धाव घेत आहेत. मात्र औषधसाठाच उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, आरोग्य केंद्र व ग्रामीण रूग्णांलयांमध्ये सर्दी, खोकल्याचीही गोळी मिळत नसल्याने रोष आहे.वातावरणाच्या बदलाने जिल्ह्यातील अनेक भागांत तापाची साथ पसरली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालये सध्या रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, सर्दी, ताप, खोकल्याचा औषधसाठाच केंद्रात नाही. रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकारी बळी पडत आहे. साथरोगाच्या दिवसांतच औषधे नसल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालआ आहे.जिल्ह्यात ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३९ आरोग्य उपकेंद्र, नऊ फिरते पथक, १० आयुर्वेद रुग्णालये आहेत. या रुग्णालयात अनेक औषधे नाहीत. दोन वर्षांपासून औषधे पुरविण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला दिलेली आहे. ही कंपनी मागणीनुसार औषधांचा पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना करीत आहे. राज्यभरात ही कंपनी औषधांचा पुरवठा करीत आहे. आता औषधांचा पुरवठा करणे या कंपनीला जड जात असल्याचे दिसून येते.वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, हगवण, उलट्या अशा आजारांनी नागरिक बेजार आहेत. त्यावरील औषधेही सध्या रूग्णांलयांमध्ये उपलब्ध नाहीत. सर्दी, खोकल्यावरील सिपीकजीन्स व सीकोडॅक्झीन ही साधी औषधेही नाहीत.तापाच्या रूग्णासाठी पॅरेसिटमेल टॅबलेटही अनेक रुग्णालयांत नाही. शरीरात पाणी टिकवून ठेवण्याचे काम करणारे ओआरएस पावडरही सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या रोषाला वैद्यकीय अधिकाऱ्यांना बळी पडावे लागत आहे.क्षयरोग व उच्चदाब तपासणी बंदराज्य शासनाच्या माध्यमातून २०१२ मध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमातून ग्रामीण भागात क्षयरोग, उच्चदाब रुग्णांची नियमितपणे तपासणी सुरू करण्यात आली. तेव्हा आवश्यक ती औषधे देण्यात येत होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही तपासणी बंद आहे. शुगर तपासणीही बंद करण्यात आली असून तपासणी करताना आवश्यक असलेल्या ग्लुकोस्ट्रीप अनेक रुग्णालयांत उपलब्ध नाही. प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीनंतर महिलांना कॅल्शिअमच्या गोळ्या दिल्या जातात. मात्र, त्याही अनेक रूग्णालयात उपलब्ध नाहीत.औषध पुरवठ्याचे काम मुंबईच्या हॉपकीन कंपनीला देण्यात आले आहे. जिल्ह्यात काही आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असेल. मात्र लवकरच ही परिस्थिती सुधारेल व रूग्णांना औषधे मिळतील.- डॉ. सतीश गोगुलवारजिल्हा आरोग्य अधिकारी.