शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षाची बेलगाम पार्किंग ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:38 IST

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अ‍ॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अ‍ॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांना त्रास, कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅटोरिक्षाची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी अ‍ॅटोरिक्षा उभे करण्यास वाहनतळ मिळत नाही. तर तसेच प्रवाशांसाठी अ‍ॅटोरिक्षाचालक वाटेल तिथे आॅटो थांबवत असल्याने शहरामध्ये अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. मात्र सदर व्यवस्था सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले आहे.चंद्रपूर शहराची झपाट्याने वाढ होत आहे. तसेच चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शहरामध्ये अ‍ॅटोरिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यास्थितीत चंद्रपुरात ३६०० च्या जवळपास अ‍ॅटोरिक्षा आहेत. त्यातही दिवसागणिक वाढ होत आहे. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्यासुद्धा वाढली आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. चंद्रपुरातील रस्ते पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण करुन रस्ते पुन्हा अरुंद केले आहे. तर शहरातील गांधी चौक, जटपूरा गेट, गिरणार चौक, रामनगर चौकातील मार्गावर अनेक बेलगाम आॅटो थांबून असतात. तसेच प्रवासी पाहून अनेक ठिकाणी आॅटोचालक आॅटो थांबवितात. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. मात्र आॅटोचालकांवर कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आॅटोचालक बिनदिक्कतपणे रस्त्यावर आॅटो थांबवत आहेत. याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अनेक अ‍ॅटोचालकांकडे परमिटच नाहीचंद्रपूर शहरात दिवसेंदिवस आॅटोरिक्षाची संख्या वाढत आहे. सद्यास्थित शहरामध्ये ३६०० च्या जवळपास आॅटोरिक्षा आहेत. तर अनेक आॅटोरिक्षाचालकांकडे परमिट नसतानासुद्धा सर्रास आॅटो चालवित आहेत. तर अनेकजण एकाच परमिटवर दोन ते तीन आॅटो चालवित आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.वाहनतळ वाढविण्याची मागणीचंद्रपुरातील आॅटोचालकांना ५७ अधिकृत वाहनतळ ठरवूण देण्यात आले आहेत. त्यामध्ये बसस्थानक चौक, रेल्वे स्टेशन, गिरणार चौक, रामनगर, बांग्ला चौक, सरकारी दवाखाना, गांधी चौक, बंगली कॅम्प यासह अनेक मुख्य चौकांचा समावेश आहे. मात सदर वाहनतळ अपुरे पडत असल्याने १०४ अधिकृत वाहनतळ देण्याची मागणी आॅटोचालकांकडून होत आहे.प्रवाशांची लूटआॅटो संघटनेने शहरातील दर निश्चित केले आहे. मात्र अनेक आॅटोचालक या नियमांचे उल्लंघन करुन प्रवाश्यांकडून अतिरिक्त दर आकारत आहेत. अनेकदा नवखा प्रवाशी हेरुन आॅटोचालक त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकडत असतात. यावर निर्बंध लादण्याची मागणी प्रवासी वर्गांकडून होत आहे.