शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

गुरांवरील प्रेमापोटी त्याला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:30 IST

नवरगाव (चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडलाजवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरुणावर पट्टेदार ...

नवरगाव (चंद्रपूर) : सिंदेवाही तालुक्यातील खांडलाजवळील खरकाळ नाला परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले (३६) या तरुणावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पिपर्डा बिटातील कक्ष क्रमांक ५६३ मध्ये घडली.

सर्वत्र वाघाचा धुमाकूळ असल्याने खांडला येथील गुरे चारणे गुराख्यांनी बंद केले. मात्र घरी गुरे असल्याने ते राखण्याचा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे खांडलावासीयांनी मीटिंग घेऊन आळीपाळीने रोज गावातील तीन माणसे गुरे चारण्यासाठी जातील, असे ठरल्याने अनिल पांडुरंग सोनुले, गजानन कुंभरे आणि विलास कुंभरे अशा तीन व्यक्ती रविवारची पाळी असल्याने गुरे चारण्यासाठी गेले होते. खांडला गावापासून तीन किमी अंतरावरील पळसगाव रेंजमधील पिपर्डा बिटात खरकाळ नाला परिसरात तिघे जण तीन भागांत गुरे चारत होते. अनिल उन्हामुळे पळसाच्या झाडाखाली बसला होता. त्याला ऐकू येत नव्हते. अशातच अचानक पट्टेदार वाघाने हल्ला करून सुमारे ३० मीटरपर्यंत ओढत नेले. याकडे गजानन कुंभरे यांचे लक्ष जाताच त्यांनी आरडाओरडा करणे सुरू केली. अनिलला तेथेच सोडून वाघाने धूम ठोकली. तोपर्यंत अनिलचा मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या घटनेपूर्वी याच जंगलातील वाघडोह परिसरात पट्टेदार वाघाने शेळीवर हल्ला करून जागीच ठार केले. रत्नापूर बिटाचे वनरक्षक जे.एस. वैद्य व इतर पाच व्यक्ती पंचनाम्यासाठी गेले असता वाघ तेथेच बसून होता. शेवटी गावकऱ्यांना घटनास्थळी बोलाविल्यानंतर वाघ तिथून निघून गेला. ही घटना दुपारी २ च्या सुमारास घडली. यासोबतच खांडलापासून दोन किमी अंतरावर सरांडी येथे वाघाने हल्ला करून सदाशिव मोहुर्ले यांची शेळी ठार केली. ही घटना २.३० वाजताच्या सुमारास घडली. तीनही घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने सदर वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. अनिलच्या मृत्यूपश्च्यात पत्नी, मुलगा व मुलगी असून तो घरातील कमावता व्यक्ती होता.

महिला वनरक्षकांनी नदी ओलांडून गाठले घटनास्थळ

घटनास्थळ पिपर्डा बिटात असून येथे येण्यासाठी उमा नदी पडते. शिवाय नदीला साडेतीन ते चार फूट पाणी वाहत आहे. मात्र वाघाने माणसाला मारले असल्याने प्रथम घटनास्थळी पोहोचणे हे आपले कर्तव्य समजून पिपर्डा बिटाच्या वनरक्षक सीमा ठाकरे यांनी उमा नदीच्या पाण्यातूनन वाट काढत घटनास्थळ गाठले.

200921\img_20210919_163355.jpg

याच ठिकाणी मारल्यानंतर नागरीकांनी गर्दी केली