शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हातावर पोट असणारे आर्थिक संकटात भरडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:01 IST

तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीबाजार व बाजार समितीमध्ये शेतीमालाचे होणारे लिलाव बंद आहेत. बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : हाताला काम नाही खिशात पैसे नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हातावर पोट असणारा, अर्थव्यवस्थेच्या अगदी तळाशी असणारा आणि आर्थिक ताकद नसलेला कमजोर समुदाय लॉकडाऊनमुळे भरडण्याची चिन्हे दिसत आहेत. सद्यस्थितीत या समुदायाला प्रशासन व विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांकडून थोडी मदत मिळत आहे. मात्र, दररोज कष्ट केल्याशिवाय मजुरी मिळत नाही, अशी स्थिती असणाऱ्या या उपेक्षित कष्टकरी वंचित समुदायाला उद्याचे काय, हा प्रश्न भेडसावत आहेत.तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीबाजार व बाजार समितीमध्ये शेतीमालाचे होणारे लिलाव बंद आहेत. बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला. दररोज आलेला माल उतरून घेणे, दुसऱ्या गाडीत भरून देणे, यासारखी कष्टाची कामे माथाडी कामगार करतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. परंतू गेल्या महिन्याभरापासून हे काम बंद आहे. त्यामुळे माथाडींवर घरी बसण्याची वेळ आली आहे. हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत, दिवस काढायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू आहे.शासनाच्या गोदामातून गहू, तांदूळ रेल्वेने येतो. हे धान्य उतरवून ते वाहनामध्ये भरून देण्याचे काम काही कामगार करत आहेत. मात्र, ही संख्या कमी आहे. या उलट घरी बसणाऱ्यांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यामध्ये सुमारे २०० माथाडी कामगार काम करतात. मात्र कारखाने बंद असल्याने कामगारांनाही काम नाही. त्यामुळे तेही घरी बसून असल्याने कुटुंबीयांची चिंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.फेरीवाले अडचणीतलॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील भाजी, फळविक्रेते वगळता अडीच हजार फेरीवाल्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. रोजचे उत्पन्नच थांबल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे संचारबंदी असल्याने बाजारपेठात शुकशुकाट आहे. भाजीपाला व फळविक्री करणारे वगळून इतर फेरीवाल्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० दिवसांपासून व्यवसाय बंद ठेवून फेरीवाले घरी बसले आहेतकर्जफेडीचा कालावधी वाढवून द्यावाकाहींनी कर्ज काढून माल विकत आणला आहे. त्यामुळे व्यापाºयांचे पैसे कसे फेडायचे या विचारातआहेत. लहान मुलांची कपडे विक्री, होजिअरी, चहा, चायनीज विक्रेते, वडा, भजी, इडली, अप्पे, डोसा विक्रेते, भेल विक्रेते पानपट्टीवाले लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडले आहेत. फेरीवाले सावकारी पाशात अडकण्याचा धोका निर्माण झाला असून अशा प्रतिकूल परिस्थितीत मदत करण्याची गरज आहे. शासनाने बँकांना फेरीवाल्यांची हमी देवून हप्त्यांसाठी कालावधी वाढवून देण्याची मागणी फेरीवाल्यांनी केली आहे.उधारीत उचलेला माल घराचउत्पन्नच बंद झाल्याने काही कुटुंबीयांचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत. उसणवारीवर उदरनिर्वाह सुरू असून बँकांचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्न आहे. अनेक फेरीवाल्यांनी व्यवसायासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतली आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना हप्ते भरणे कठीण झाले आहे. बहुतांश फेरीवाल्यांना स्वत:चे घर नाही. भाड्याच्या घरात राहत असल्याने दुहेरी कोंडी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार