शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

घरेलू कामगारांची नोंदणी केली का? नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 14:23 IST

तुटपुंज्या पगारात घर चालविणे होते कठीण : कामगारांना विविध लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : घरगुती काम करणाऱ्या महिला, पुरुषांना अनेकवेळा तुटपुंजा पगारात स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. मात्र, यातून ते शक्य होत नाही. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला व पुरुषांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार विभागाने घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना सुरू केली आहे. त्यांच्याकडून माहिती घेऊन या कामगारांना विविध योजनांचा लाभमिळवून दिला जातो.

या योजनांच्या माध्यमातून कामगारांना जगणे सुसह्य होत असून अनेकांना याचा लाभसुद्धा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य कामगारांनीही नोंदणी करून योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. 

कामगारांच्या पाल्यांना इयत्ता नववी ते बारावीकरिता तसेच आयटीआयचा कोर्स करत असल्यास दरवर्षी उत्तीर्ण होत असल्यास, दर तिमाहीकरिता ३०० रुपये जास्तीत जास्त दोन मुलांकरिता दिले जातात. मृत घरेलू कामगाराच्या कायदेशीर वारसाला अंत्यविधी साहाय्य दोन हजार रुपये मिळतात. घरेलू कामगाराला दोन अपत्यांपर्यंत प्रत्येक प्रसूतीकरिता पाच हजार रुपये शासनाकडून मदत केली जाते. पदविका अभ्यासक्रमासाठी मंडळातर्फे ९०० व पूर्वतयारी शिक्षणक्रमासाठी ६५० रुपये देण्यात येतात. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येने घरेलु कामगार असतानाही शासनदरबारी अगदीच अल्प कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य कामगारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे.

१० हजार भांड्यांचा संच यंदा नोंदणी असणाऱ्या बहुतांश घरेलू कामगारांना मिळाला, तसेच वयाची ५५ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना एकदाच १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.

ही आहेत लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, नोंदणी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील, जेथे काम करत आहे तेथील मालकाचे संपूर्ण नाव व पत्ता.

चंद्रपूर शहरात अनेक घरेलू कामगार वंचित ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये घरलू कामगारांची संख्या अधिक आहे. मात्र अनेक कामगार हे संघटनात्मक जुळलेले नसल्याने, नोंदणीकृत संस्थेत जोडले नसल्याने या कामगारांना लाभ मिळत नाही.

नोंदणी कोठे व कशी करायची?

  • जिल्हा सहायक कामगार अधिकारी यांच्याकडे नोंदणी करता येते. त्यासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • महाराष्ट्रातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. अर्जदार घरगुती कामगार असणे आवश्यक आहे. 
  • घरकाम करणारा व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू असलेल्या अन्य योजनेंतर्गत लाभ घेता असता कामा नये. अर्जदार व्यक्तीची घरकाम कामगार संघटनेमध्ये नोंदणी आवश्यक आहे.

घरेलू कामगारांना हे मिळतात लाभनैसर्गिक मृत्यू - ३०,००० अपंगत्व  - ७५,००० अपघाती मृत्यू  - ७५,००० अंशतः अपंगत्व  - ३७,५००

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर