शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कापणीला आलेले सोयाबीन अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 00:45 IST

गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने ...

पावसाचा परिणाम : हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया जाणारगोवरी : गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीचा काळ आहे. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी केली नाही. सोयाबीनची कापणी केली तर पावसामुळे सोयाबीन सडून खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कापणी करण्याचे टाळले आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे सोयाबिन कापणीला आहे. पावसामुळे सोयाबीनची कापणी खोळंबली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या महाबीज सोयाबीनला त्याचा मोठा फटका बसला आहे. इतर कंपनीच्या सोयाबीनपेक्षा महामंडळाचे महाबीज सोयाबीन कापणीला लवकर झाल्याने पावसामुळे सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनचे कापणी करुन ढिग करुन ठेवले आहे. मात्र पाच- सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. यावर्षी सोयाबीन पिकांना चांगले दिवस येईल, असे वाटत असतानाच अवकाळी आलेल्या पावसाने सोयाबीनचा घात केला आहे. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना बळकटी देत असतात. हे पीक कमी कालावधीचे असल्याने शेतकरी यातून वर्षभराचा खर्च करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक ताण कमी होतो. परंतु यावेळी आलेली परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती. मात्र हाच पडणारा पाऊस सोयाबीन पिकांसाठी घातक ठरेल, असा विचारही शेतकऱ्यांच्या मनाला कधी शिवला नसेल. पावसामुळे बहुतांश शेतातील सोयाबीन अंकुरले असल्याने शेतकरी पुन्हा काकुळतिला आला आहे. (वार्ताहर)पावसाने केला सोयाबीनचा घातगेल्या पाच- सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हा पाऊस सर्व पिकांसाठी चांगला असला तरी सोयाबीन पिकासाठी घातक आहे. सोयाबीन सध्या कापणीवर आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर जिवाचे रान करुन शेतकऱ्यांनी उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब अंकुरले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक सडून खराब होत असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. - रामदास देवाळकर, शेतकरी गोवरी,