शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

कापणीला आलेले सोयाबीन अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 00:45 IST

गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने ...

पावसाचा परिणाम : हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया जाणारगोवरी : गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीचा काळ आहे. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी केली नाही. सोयाबीनची कापणी केली तर पावसामुळे सोयाबीन सडून खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कापणी करण्याचे टाळले आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे सोयाबिन कापणीला आहे. पावसामुळे सोयाबीनची कापणी खोळंबली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या महाबीज सोयाबीनला त्याचा मोठा फटका बसला आहे. इतर कंपनीच्या सोयाबीनपेक्षा महामंडळाचे महाबीज सोयाबीन कापणीला लवकर झाल्याने पावसामुळे सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनचे कापणी करुन ढिग करुन ठेवले आहे. मात्र पाच- सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. यावर्षी सोयाबीन पिकांना चांगले दिवस येईल, असे वाटत असतानाच अवकाळी आलेल्या पावसाने सोयाबीनचा घात केला आहे. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना बळकटी देत असतात. हे पीक कमी कालावधीचे असल्याने शेतकरी यातून वर्षभराचा खर्च करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक ताण कमी होतो. परंतु यावेळी आलेली परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती. मात्र हाच पडणारा पाऊस सोयाबीन पिकांसाठी घातक ठरेल, असा विचारही शेतकऱ्यांच्या मनाला कधी शिवला नसेल. पावसामुळे बहुतांश शेतातील सोयाबीन अंकुरले असल्याने शेतकरी पुन्हा काकुळतिला आला आहे. (वार्ताहर)पावसाने केला सोयाबीनचा घातगेल्या पाच- सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हा पाऊस सर्व पिकांसाठी चांगला असला तरी सोयाबीन पिकासाठी घातक आहे. सोयाबीन सध्या कापणीवर आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर जिवाचे रान करुन शेतकऱ्यांनी उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब अंकुरले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक सडून खराब होत असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. - रामदास देवाळकर, शेतकरी गोवरी,