शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

कापणीला आलेले सोयाबीन अंकुरले

By admin | Updated: October 3, 2016 00:45 IST

गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने ...

पावसाचा परिणाम : हाती आलेले सोयाबीनचे पीक वाया जाणारगोवरी : गेल्या पाच-सहा दिवसापासून पडत असलेल्या पावसाने कापणीला आलेल्या सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शेतकरी या ना त्या कारणाने नेहमीच संकटात सापडला आहे. सध्या सोयाबीन पिकाच्या कापणीचा काळ आहे. पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कापणी केली नाही. सोयाबीनची कापणी केली तर पावसामुळे सोयाबीन सडून खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी कापणी करण्याचे टाळले आहे. सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे सोयाबिन कापणीला आहे. पावसामुळे सोयाबीनची कापणी खोळंबली आहे. विशेष म्हणजे, महामंडळाच्या महाबीज सोयाबीनला त्याचा मोठा फटका बसला आहे. इतर कंपनीच्या सोयाबीनपेक्षा महामंडळाचे महाबीज सोयाबीन कापणीला लवकर झाल्याने पावसामुळे सोयाबीनला कोंब अंकुरत असल्याने हाती आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबिनचे कापणी करुन ढिग करुन ठेवले आहे. मात्र पाच- सहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने सोयाबीनचे पीक खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजले आहे. शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे. यावर्षी सोयाबीन पिकांना चांगले दिवस येईल, असे वाटत असतानाच अवकाळी आलेल्या पावसाने सोयाबीनचा घात केला आहे. सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना बळकटी देत असतात. हे पीक कमी कालावधीचे असल्याने शेतकरी यातून वर्षभराचा खर्च करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आलेला आर्थिक ताण कमी होतो. परंतु यावेळी आलेली परिस्थिती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली आहे. शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता होती. मात्र हाच पडणारा पाऊस सोयाबीन पिकांसाठी घातक ठरेल, असा विचारही शेतकऱ्यांच्या मनाला कधी शिवला नसेल. पावसामुळे बहुतांश शेतातील सोयाबीन अंकुरले असल्याने शेतकरी पुन्हा काकुळतिला आला आहे. (वार्ताहर)पावसाने केला सोयाबीनचा घातगेल्या पाच- सहा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. हा पाऊस सर्व पिकांसाठी चांगला असला तरी सोयाबीन पिकासाठी घातक आहे. सोयाबीन सध्या कापणीवर आले आहे. पाऊस असाच पडत राहिला तर जिवाचे रान करुन शेतकऱ्यांनी उभे केलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होणार आहे.सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकांना कोंब अंकुरले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक सडून खराब होत असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. - रामदास देवाळकर, शेतकरी गोवरी,