शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बायकोकडून होतोय छळ, कोरोना काळात तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कोरोना काळामध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याच्या ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कोरोना काळामध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांनी पोलीस ठाण्याची पायरीही चढली आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आता संयु्क्त कुटुंब पद्धती कमी होत आहे. प्रत्येक जण विभक्त कुटुंबामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक कुटुंबात पती-पत्नींमध्ये वाद विकोपाला जात आहे. यामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीही कारणीभूत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. विशेषत: शारीरिक, आर्थिक, लैंगिक आणि राजकीय कारण यामागे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पती-पत्नींमध्ये वाद झाला तरीही महिलांच्या बाजूचे कायदे भक्कम असल्यामुळेच अनेकवेळा कारण नसतानाही पती मुकाट्याने त्रास सहन करीत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याचा वापर करा, मात्र, गैरवापर करून एखाद्याला त्रास देण्याचा प्रकार टाळा, असेही भारतीय परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे.

बाॅक्स

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

कुटुंबामध्ये कलह होण्याच्या मुख्य कारणांमध्ये आर्थिक, शारिरीक, लैंगिक, राजकीय तसेच घरघुती कारणे आहेत. या कारणांमुळे अनेक कुटुंबे तुटली आहेत. नवऱ्याला, जावयाचा धडा शिकवू या कारणामुळेही अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

बाॅक्स

कोरोना काळात तक्रारी वाढल्या

कोरोना काळ सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे. लाॅकडाऊनच्या काळामध्ये काहींच्या घरी आर्थिक ताण पडला. त्यामुळे कुटुंबांमध्ये कलह वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांनाच सुटी असल्यामुळे घरची मंडळी घरात रहात असल्यामुळेही अनेकांच्या घरात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पती,पत्नीमध्ये वाढ विकोपाला गेले आहेत.

बाॅक्स

मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते

१.सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद विकोपाला जात आहे. वडिलधाऱ्यांचा धाक राहत नाही. त्यामुळे मानसिकच नाही तर मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत.

२.पती-पत्नीच्या भांडणामध्ये मोबाईल मुख्य भूमिका बजावत आहे. यामुळे अनेकांच्या घरात भांडणे होत असून गैरसमजही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

बाॅक्स

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

कधी कायद्याचा गैरवापर करून तर कधी कायद्याचा धाक दाखवून पती तसेच सासरच्या मंडळींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक परिवार पीडित आहेत. कोरोना काळामध्ये या तक्रारी काही प्रमाणात वाढल्या आहेत. अशा एकमेकांपासून दुरावलेल्या परिवाराला भांडणापासून वाचविण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जात आहेत.

-डाॅ. नंदकिशोर मैंदळकर

जिल्हाध्यक्ष

भारतीय परिवार बचाव संघटना, चंद्रपूर