शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

बायकोकडून होतोय छळ, कोरोना काळात तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कोरोना काळामध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याच्या ...

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये समाजात कौटुंबिक कलहाचे प्रकार वाढत आहेत. त्यातच कोरोना काळामध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांनी पोलीस ठाण्याची पायरीही चढली आहे. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. आता संयु्क्त कुटुंब पद्धती कमी होत आहे. प्रत्येक जण विभक्त कुटुंबामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अनेक कुटुंबात पती-पत्नींमध्ये वाद विकोपाला जात आहे. यामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीही कारणीभूत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. विशेषत: शारीरिक, आर्थिक, लैंगिक आणि राजकीय कारण यामागे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पती-पत्नींमध्ये वाद झाला तरीही महिलांच्या बाजूचे कायदे भक्कम असल्यामुळेच अनेकवेळा कारण नसतानाही पती मुकाट्याने त्रास सहन करीत असल्याचे परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याचा वापर करा, मात्र, गैरवापर करून एखाद्याला त्रास देण्याचा प्रकार टाळा, असेही भारतीय परिवार बचाव संघटनेचे म्हणणे आहे.

बाॅक्स

आर्थिक टंचाई आणि अति सहवास

कुटुंबामध्ये कलह होण्याच्या मुख्य कारणांमध्ये आर्थिक, शारिरीक, लैंगिक, राजकीय तसेच घरघुती कारणे आहेत. या कारणांमुळे अनेक कुटुंबे तुटली आहेत. नवऱ्याला, जावयाचा धडा शिकवू या कारणामुळेही अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

बाॅक्स

कोरोना काळात तक्रारी वाढल्या

कोरोना काळ सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे. लाॅकडाऊनच्या काळामध्ये काहींच्या घरी आर्थिक ताण पडला. त्यामुळे कुटुंबांमध्ये कलह वाढल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वांनाच सुटी असल्यामुळे घरची मंडळी घरात रहात असल्यामुळेही अनेकांच्या घरात वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पती,पत्नीमध्ये वाढ विकोपाला गेले आहेत.

बाॅक्स

मानसिक छळच नव्हे तर मारहाणही करते

१.सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे कौटुंबिक वाद विकोपाला जात आहे. वडिलधाऱ्यांचा धाक राहत नाही. त्यामुळे मानसिकच नाही तर मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत.

२.पती-पत्नीच्या भांडणामध्ये मोबाईल मुख्य भूमिका बजावत आहे. यामुळे अनेकांच्या घरात भांडणे होत असून गैरसमजही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

बाॅक्स

पुरुषांच्या हक्कासाठी कोण लढणार?

कधी कायद्याचा गैरवापर करून तर कधी कायद्याचा धाक दाखवून पती तसेच सासरच्या मंडळींना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक परिवार पीडित आहेत. कोरोना काळामध्ये या तक्रारी काही प्रमाणात वाढल्या आहेत. अशा एकमेकांपासून दुरावलेल्या परिवाराला भांडणापासून वाचविण्यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जात आहेत.

-डाॅ. नंदकिशोर मैंदळकर

जिल्हाध्यक्ष

भारतीय परिवार बचाव संघटना, चंद्रपूर