शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या पडोलीत 'हर घर राहुल गांधी'; एनएसयूआयचा उपक्रम

By राजेश भोजेकर | Updated: March 29, 2023 17:06 IST

एनएसयूआयच्या अभियानाला जनतेचा मिळतोय प्रतिसाद

चंद्रपूर : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसच्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसची राष्ट्रीय विद्यार्थी संघटना अर्थात एनएसयूआयच्यावतीने चंद्रपूर शहरातील पडोली येथील प्रत्येक घरावर राहुल गांधी यांचे छायाचित्र लावून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव जनतेला करून दिली जात आहे.

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोलीतील अनेक घरांच्या भिंतींवर राहुल गांधी यांच्या समर्थनाचे स्टीकर्स लावण्यात आले आहेत. या संदर्भात एनएसयूआयचे नेते रोशन लाल बिट्टू यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. “चंद्रपूर महाराष्ट्रातील पडोली गावाचे दृश्य, पंतप्रधान मोदी राहुल गांधींना किती हृदयातून आणि घरांतून काढून टाकतील, असे ट्विट त्यांनी केले आहे. हुकुमशाही व्यवस्थेला आरसा दाखवत राहुल गांधी यांनी रस्त्यावरून संसदेपर्यंत आमचा आवाज उचलून धरला आहे. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

एनएसयूआयच्या या अभियानाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बिट्टू यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करणे ही देशात हुकूमशाहीची सुरुवात आहे, असा आरोप काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी यापूर्वीच केला आहे, तर  माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलिया यांनीही भाजपप्रणित मोदी सरकार दडपशाही करीत असल्याची टीका केली आहे. आता काँग्रेस नेत्यांनी या माध्यमातून राहुल गांधी व त्यांच्यावरील अन्यायाला  घराघरात पोहचवण्याचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीchandrapur-acचंद्रपूर