शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

असे घडले गावगणराज्याचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:46 IST

तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, ...

ठळक मुद्देअड्याळ टेकडी : गीताचार्य तुकाराम दादाच्या स्वप्नातील लोकाभिमुख उपक्रम सुरूच

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, असा विचार राष्ट्रसंताच्या मनात आला़ त्यांनी तसे सुचितही केले. महाराजाची आज्ञा होताच दादा सहजपणे तयार झाले आणि एका गावगणराज्याच्या प्रेरणादायी विद्यापीठाची निर्मिती झाली.गीताचार्य तुकारामदादा अड्याळ टेकडीवर आले, तेव्हा तेथे मानवी वस्ती अजिबात नव्हती़ केवळ कीर्र जंगल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या सुचनेनुसार दादांनी ३० जुलै १९६७ ला स्वत:चे आत्मबल सिद्ध करण्यासाठी अड्याळ टेकडीवर विधायक कार्याची सुरू केली. यावेळी राष्ट्रसंतानी उपस्थित राहून दादांच्या या कार्याला आशिर्वाद दिला. दादांच्या कार्यामुळे परिसरातील परिसरातील नागरिक प्रभावित होवू लागले़ एरवी टेकडीकडे कधीच न येणारेही दादांच्या कार्यापासून पे्रेरणा घेवू लागले़ दादांना लोकांच्या सहकार्याने या टेकडीवर राष्ट्रसंताच्या कल्पनेतील एक आदर्श गाव निर्माण करायचे होते. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सन्मार्गाचा संदेश दिला़ गावाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे धडे दिले़ गावगणराज्यातून माणूस कसा घडतो, याचे विविध प्रयोग सुरू केले़ दादांनी लोकाभिमुख कार्याचे जणू विद्यापीठच सुरू केले़ नागरिक तनमन धनाने श्रमदान करू लागले. श्रमदानातूनच आज या टेकडीचे रूपांतर एका गावात झाले आहे .श्रमदानातून उभ्या झाल्या इमारतीसत्संग भवन, सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय,महिलाश्रम, ग्रामगीता विद्यापीठ, निसर्गोपचार केंद्र आदी विविध इमारतींची निर्मिती टेकडीवर करण्यात आली. इमारतींच्या निर्मितीकरिता नागरिकांनी केवळ लोखंड व सिमेंट खरेदी करून दिली़ अन्य सर्व कामे श्रमदानातूनच पूर्ण करण्यात आली आहेत.निष्काम भावनेतून गावकऱ्यांनी केली मदतटेकडीवरील इमारतींची पैशाच्या रूपात किंमत काढल्यास कोट्यवधी रुपये कमी पडतील़ पण दादांची किमया व राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून ही सर्व कामे केवळ श्रमदानातून उभी झाली आहेत. पण, या कामात पुढाकार घेणाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही की नावाचा फ लक लावण्यात आला नाही. दिलेल्या मदतीची पावतीसुद्धा नाही. जनतेच्या केवळ निष्काम भावनेने या लोकविद्यापीठाला आकार मिळाला आहे़