शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

असे घडले गावगणराज्याचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:46 IST

तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, ...

ठळक मुद्देअड्याळ टेकडी : गीताचार्य तुकाराम दादाच्या स्वप्नातील लोकाभिमुख उपक्रम सुरूच

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, असा विचार राष्ट्रसंताच्या मनात आला़ त्यांनी तसे सुचितही केले. महाराजाची आज्ञा होताच दादा सहजपणे तयार झाले आणि एका गावगणराज्याच्या प्रेरणादायी विद्यापीठाची निर्मिती झाली.गीताचार्य तुकारामदादा अड्याळ टेकडीवर आले, तेव्हा तेथे मानवी वस्ती अजिबात नव्हती़ केवळ कीर्र जंगल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या सुचनेनुसार दादांनी ३० जुलै १९६७ ला स्वत:चे आत्मबल सिद्ध करण्यासाठी अड्याळ टेकडीवर विधायक कार्याची सुरू केली. यावेळी राष्ट्रसंतानी उपस्थित राहून दादांच्या या कार्याला आशिर्वाद दिला. दादांच्या कार्यामुळे परिसरातील परिसरातील नागरिक प्रभावित होवू लागले़ एरवी टेकडीकडे कधीच न येणारेही दादांच्या कार्यापासून पे्रेरणा घेवू लागले़ दादांना लोकांच्या सहकार्याने या टेकडीवर राष्ट्रसंताच्या कल्पनेतील एक आदर्श गाव निर्माण करायचे होते. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सन्मार्गाचा संदेश दिला़ गावाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे धडे दिले़ गावगणराज्यातून माणूस कसा घडतो, याचे विविध प्रयोग सुरू केले़ दादांनी लोकाभिमुख कार्याचे जणू विद्यापीठच सुरू केले़ नागरिक तनमन धनाने श्रमदान करू लागले. श्रमदानातूनच आज या टेकडीचे रूपांतर एका गावात झाले आहे .श्रमदानातून उभ्या झाल्या इमारतीसत्संग भवन, सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय,महिलाश्रम, ग्रामगीता विद्यापीठ, निसर्गोपचार केंद्र आदी विविध इमारतींची निर्मिती टेकडीवर करण्यात आली. इमारतींच्या निर्मितीकरिता नागरिकांनी केवळ लोखंड व सिमेंट खरेदी करून दिली़ अन्य सर्व कामे श्रमदानातूनच पूर्ण करण्यात आली आहेत.निष्काम भावनेतून गावकऱ्यांनी केली मदतटेकडीवरील इमारतींची पैशाच्या रूपात किंमत काढल्यास कोट्यवधी रुपये कमी पडतील़ पण दादांची किमया व राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून ही सर्व कामे केवळ श्रमदानातून उभी झाली आहेत. पण, या कामात पुढाकार घेणाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही की नावाचा फ लक लावण्यात आला नाही. दिलेल्या मदतीची पावतीसुद्धा नाही. जनतेच्या केवळ निष्काम भावनेने या लोकविद्यापीठाला आकार मिळाला आहे़