शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

असे घडले गावगणराज्याचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:46 IST

तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, ...

ठळक मुद्देअड्याळ टेकडी : गीताचार्य तुकाराम दादाच्या स्वप्नातील लोकाभिमुख उपक्रम सुरूच

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, असा विचार राष्ट्रसंताच्या मनात आला़ त्यांनी तसे सुचितही केले. महाराजाची आज्ञा होताच दादा सहजपणे तयार झाले आणि एका गावगणराज्याच्या प्रेरणादायी विद्यापीठाची निर्मिती झाली.गीताचार्य तुकारामदादा अड्याळ टेकडीवर आले, तेव्हा तेथे मानवी वस्ती अजिबात नव्हती़ केवळ कीर्र जंगल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या सुचनेनुसार दादांनी ३० जुलै १९६७ ला स्वत:चे आत्मबल सिद्ध करण्यासाठी अड्याळ टेकडीवर विधायक कार्याची सुरू केली. यावेळी राष्ट्रसंतानी उपस्थित राहून दादांच्या या कार्याला आशिर्वाद दिला. दादांच्या कार्यामुळे परिसरातील परिसरातील नागरिक प्रभावित होवू लागले़ एरवी टेकडीकडे कधीच न येणारेही दादांच्या कार्यापासून पे्रेरणा घेवू लागले़ दादांना लोकांच्या सहकार्याने या टेकडीवर राष्ट्रसंताच्या कल्पनेतील एक आदर्श गाव निर्माण करायचे होते. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सन्मार्गाचा संदेश दिला़ गावाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे धडे दिले़ गावगणराज्यातून माणूस कसा घडतो, याचे विविध प्रयोग सुरू केले़ दादांनी लोकाभिमुख कार्याचे जणू विद्यापीठच सुरू केले़ नागरिक तनमन धनाने श्रमदान करू लागले. श्रमदानातूनच आज या टेकडीचे रूपांतर एका गावात झाले आहे .श्रमदानातून उभ्या झाल्या इमारतीसत्संग भवन, सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय,महिलाश्रम, ग्रामगीता विद्यापीठ, निसर्गोपचार केंद्र आदी विविध इमारतींची निर्मिती टेकडीवर करण्यात आली. इमारतींच्या निर्मितीकरिता नागरिकांनी केवळ लोखंड व सिमेंट खरेदी करून दिली़ अन्य सर्व कामे श्रमदानातूनच पूर्ण करण्यात आली आहेत.निष्काम भावनेतून गावकऱ्यांनी केली मदतटेकडीवरील इमारतींची पैशाच्या रूपात किंमत काढल्यास कोट्यवधी रुपये कमी पडतील़ पण दादांची किमया व राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून ही सर्व कामे केवळ श्रमदानातून उभी झाली आहेत. पण, या कामात पुढाकार घेणाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही की नावाचा फ लक लावण्यात आला नाही. दिलेल्या मदतीची पावतीसुद्धा नाही. जनतेच्या केवळ निष्काम भावनेने या लोकविद्यापीठाला आकार मिळाला आहे़