शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

असे घडले गावगणराज्याचे विद्यापीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:46 IST

तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, ...

ठळक मुद्देअड्याळ टेकडी : गीताचार्य तुकाराम दादाच्या स्वप्नातील लोकाभिमुख उपक्रम सुरूच

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तालुक्यातील एका राईस मीलच्या उद्घाटनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आले होते़ दरम्यान, अड्याळ टेकडीकडे त्यांचे सहज लक्ष गेले. त्यांनी ही टेकडी श्री गुरूदेव सेवामंडळाच्या तत्त्वज्ञान प्रचार कार्यासाठी निवडली. टेकडीची जबाबदारी गीताचार्य तुकाराम दादांकडे द्यावी, असा विचार राष्ट्रसंताच्या मनात आला़ त्यांनी तसे सुचितही केले. महाराजाची आज्ञा होताच दादा सहजपणे तयार झाले आणि एका गावगणराज्याच्या प्रेरणादायी विद्यापीठाची निर्मिती झाली.गीताचार्य तुकारामदादा अड्याळ टेकडीवर आले, तेव्हा तेथे मानवी वस्ती अजिबात नव्हती़ केवळ कीर्र जंगल होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या सुचनेनुसार दादांनी ३० जुलै १९६७ ला स्वत:चे आत्मबल सिद्ध करण्यासाठी अड्याळ टेकडीवर विधायक कार्याची सुरू केली. यावेळी राष्ट्रसंतानी उपस्थित राहून दादांच्या या कार्याला आशिर्वाद दिला. दादांच्या कार्यामुळे परिसरातील परिसरातील नागरिक प्रभावित होवू लागले़ एरवी टेकडीकडे कधीच न येणारेही दादांच्या कार्यापासून पे्रेरणा घेवू लागले़ दादांना लोकांच्या सहकार्याने या टेकडीवर राष्ट्रसंताच्या कल्पनेतील एक आदर्श गाव निर्माण करायचे होते. टेकडीवर येणाऱ्या नागरिकांना त्यांनी सन्मार्गाचा संदेश दिला़ गावाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, याचे धडे दिले़ गावगणराज्यातून माणूस कसा घडतो, याचे विविध प्रयोग सुरू केले़ दादांनी लोकाभिमुख कार्याचे जणू विद्यापीठच सुरू केले़ नागरिक तनमन धनाने श्रमदान करू लागले. श्रमदानातूनच आज या टेकडीचे रूपांतर एका गावात झाले आहे .श्रमदानातून उभ्या झाल्या इमारतीसत्संग भवन, सुसज्ज ग्रंथालय,भोजनालय,महिलाश्रम, ग्रामगीता विद्यापीठ, निसर्गोपचार केंद्र आदी विविध इमारतींची निर्मिती टेकडीवर करण्यात आली. इमारतींच्या निर्मितीकरिता नागरिकांनी केवळ लोखंड व सिमेंट खरेदी करून दिली़ अन्य सर्व कामे श्रमदानातूनच पूर्ण करण्यात आली आहेत.निष्काम भावनेतून गावकऱ्यांनी केली मदतटेकडीवरील इमारतींची पैशाच्या रूपात किंमत काढल्यास कोट्यवधी रुपये कमी पडतील़ पण दादांची किमया व राष्ट्रसंताच्या प्रेरणेतून ही सर्व कामे केवळ श्रमदानातून उभी झाली आहेत. पण, या कामात पुढाकार घेणाऱ्यांचा कुठेही उल्लेख नाही की नावाचा फ लक लावण्यात आला नाही. दिलेल्या मदतीची पावतीसुद्धा नाही. जनतेच्या केवळ निष्काम भावनेने या लोकविद्यापीठाला आकार मिळाला आहे़