शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

By admin | Updated: April 8, 2017 00:45 IST

पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या ...

सुभाष धोटे : प्रकल्पग्रस्तांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणारराजुरा : पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या वेस्टन कोलफील्ड लिमिटेडविरोधात तापलेल्या उन्हात एक हजार महिला--पुरुषांचा मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चा मुख्य मार्गानी निघाला. राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने, बाळू जुल्मे, विलास घटे, महेश गाडगे, राजू मोहारे, बालाजी कुबडे, बालाजी पिंपळकर, राजू पिंपळकर, दिनेश वैरागडे, सतीश बानकर, रवी बोबडे, दिलीप नरड, रवी बेले, आकाश चन्ने, नितीन भटारकर, दीपक खनके आदी उपस्थित होते.२०११ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. सेक्शन अकरामुळे शेतीचा कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. जमिनीचा सातबारा असतानासुद्धा हलाखीचे जीवन जगत आहे.वेकोलिच्या विरोधात १ हजार ८० प्रकल्पग्रस्त विविध आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीनी हिसकावल्या. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करण्यास शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकल्पग्रस्तांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. यापूर्वी वेकोलिचे अधिकारी डॉ. सजीवकुमार, आनंद आझमी, एम. येलय्या, एम.पी. नवले, तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सभा घेतली. ३१ मार्चला बोर्ड आॅफ डायरेक्टरची सभा घेऊन प्रकल्पाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय गृहमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा असून मागील पाच वर्षापासून शेतकरी नोकरीपासून वंचित असल्याने मोठे नुकसान झाले आहे. न्याय न मिळाल्यास खदान बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार मागील पाच वर्षांपासून राजुरा तालुक्यातील धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील १ हजार ८० प्रकल्पग्रस्त सतत लढा देत असून यापुर्वी आमरण उपोषणसुद्धा केले होते. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून काँग्रेसतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. शेकडो शेतकरी भर उन्हात आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. केवळ आश्वासन देवून चालणार नाही. प्रत्यक्षात कृती करा अन्यथा काँग्रेस मोठे आंदोलन उभे करील, असेही माजी आमदार धोटे यांनी बजावले आहे.