शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वेकोलिविरोधात एक हजार प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

By admin | Updated: April 8, 2017 00:45 IST

पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या ...

सुभाष धोटे : प्रकल्पग्रस्तांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणारराजुरा : पाच वर्षांपासून जमीन हस्तांतरण करूनही धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या वेस्टन कोलफील्ड लिमिटेडविरोधात तापलेल्या उन्हात एक हजार महिला--पुरुषांचा मोर्चा काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चा मुख्य मार्गानी निघाला. राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने, बाळू जुल्मे, विलास घटे, महेश गाडगे, राजू मोहारे, बालाजी कुबडे, बालाजी पिंपळकर, राजू पिंपळकर, दिनेश वैरागडे, सतीश बानकर, रवी बोबडे, दिलीप नरड, रवी बेले, आकाश चन्ने, नितीन भटारकर, दीपक खनके आदी उपस्थित होते.२०११ मध्ये जमिनी अधिग्रहीत केल्या. सेक्शन अकरामुळे शेतीचा कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. जमिनीचा सातबारा असतानासुद्धा हलाखीचे जीवन जगत आहे.वेकोलिच्या विरोधात १ हजार ८० प्रकल्पग्रस्त विविध आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीनी हिसकावल्या. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न करण्यास शेतकरी हवालदिल झाले आहे. या प्रकल्पग्रस्तांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. यापूर्वी वेकोलिचे अधिकारी डॉ. सजीवकुमार, आनंद आझमी, एम. येलय्या, एम.पी. नवले, तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी सभा घेतली. ३१ मार्चला बोर्ड आॅफ डायरेक्टरची सभा घेऊन प्रकल्पाचा निपटारा करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रीय गृहमंत्री ना. हंसराज अहीर यांनी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले होते. प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न महत्त्वाचा असून मागील पाच वर्षापासून शेतकरी नोकरीपासून वंचित असल्याने मोठे नुकसान झाले आहे. न्याय न मिळाल्यास खदान बंद करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांचे नेते विजय चन्ने यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार मागील पाच वर्षांपासून राजुरा तालुक्यातील धोपटाळा, भंडागपूर, सास्ती, कोलगाव, मानोली येथील १ हजार ८० प्रकल्पग्रस्त सतत लढा देत असून यापुर्वी आमरण उपोषणसुद्धा केले होते. केंद्रीय मंत्री ना. हंसराज अहीर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून काँग्रेसतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे. शेकडो शेतकरी भर उन्हात आपल्या न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. केवळ आश्वासन देवून चालणार नाही. प्रत्यक्षात कृती करा अन्यथा काँग्रेस मोठे आंदोलन उभे करील, असेही माजी आमदार धोटे यांनी बजावले आहे.