शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

बिंदूनामावलीने होणार गुरुजींच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:19 IST

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या निवडीच्या प्रवर्गानुसार होणार आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत होत नाही अथवा त्याला मागासवर्ग कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये अन्य जिल्हा परिषदांमधून रिक्त जागावर शिक्षकांना थेट पाठविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.

ठळक मुद्देग्राम सचिवांचा आदेश : आंतरजिल्हा बदलीत मिळणार न्याय

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या निवडीच्या प्रवर्गानुसार होणार आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांची बिंदूनामावली अद्ययावत होत नाही अथवा त्याला मागासवर्ग कक्ष आणि विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये अन्य जिल्हा परिषदांमधून रिक्त जागावर शिक्षकांना थेट पाठविता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश ग्रामविकास विभागाने जारी केला आहे.आंतरजिल्हा बदली प्रकरणात अन्याय झालेल्या शिक्षकांना या आदेशामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्हा परिषदांनी शिक्षकांची बिंंदूनामावली मागासवर्ग कक्षाकडून मान्य करून घेतली नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीची कार्यवाही करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. बदली प्रक्रियेत सुलभता व गतिमानताऐवजी ही प्रक्रिया क्लिष्ट झाली होती. अनेक शिक्षकांवर अन्याय होण्याचा धोका निर्माण झाला. दरम्यान, ज्या जिल्ह्यांचे रोस्टर पूर्ण नाही, अशा जिल्ह्यातील संबंधित जि. प. अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक संघटनांवर सातत्याने सुरू होती.या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी बिंदुनामावली संदर्भातील आदेश जारी केला. यापूर्वी काढलेल्या २३ आॅक्टोबरच्या आदेशामुळे अल्पसेवा झालेल्या शिक्षकांवर अन्याय होत आहे.शाळा अ श्रेणीमध्ये आणण्याची जबाबदारी सामूहिक असताना एका शिक्षकाला जबाबदार धरणे अयोग्य आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली. तालुकाअंतर्गत म्युच्युअल बदली करणे हाही एक योग्य पर्याय असल्याचे संघटनांनी सुचविले आहे.१० टक्के जागांची अटशिक्षक संघटनांनी ग्रामविकासाचे सचिव असिम गुप्ता यांची भेट घेऊन मागण्या रेटून धरल्या. बदल्या करताना पूर्वी निश्चित केलेल्या बदली धोरणांचा १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदेमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरिता रिक्तपदांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे, असे आदेशात नमूद केले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.