शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

हातावर गोंदविले ‘मेरा पीएम फेकू है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:18 IST

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देघोषणाबाजी : सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आगळेवेगळे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी धरणेही देण्यात आले.यावेळी काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, जिल्हा काँ्रग्रेस कमेटीच्या सचिव तथा जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी जि.प. सदस्य कैन्हय्यालाल जयस्वाल, पं.स. सदस्य संजीवनी भोयर, जेष्ठ नेते वसंत विधाते, नगरसेवक विठ्ठल टाले, पुरुषोत्तम निखाडे उपस्थित होते.कॉग्रेस सरकारला गॅस सिलिंडर ३९६ रुपयांपर्यंत नेण्यास ४५ वर्ष लागली. मात्र भाजप सरकारने तीन वर्षात ३९६ रुपयांचे सिलिंडर ७८४ रुपयांपर्यंत पोहचविले. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होत असनानाही पेट्रोल - डिझेलची भरमसाठ दरवाढ झाली आहे. एका महिन्यात पेट्रोलच्या किमतीत १६ रुपयांची दरवाढ करण्यात आली. शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा करण्याºया भाजप - सेना सरकारच्या कार्यकाळात शेतमालाला भाव नाही. तसेच शेतकºयांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. किचवट नियमामुळे कर्जमाफी फसवी ठरली आहे,नोटबंदीमुळे काळा पैसा सापडलाच नाही. मात्र सामान्य नागरिकांची वाट लागली. उद्योग धंदे डबघाईस आले असून अर्थ व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. दरवर्षी देशात दोन करोड नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मोदी सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात सरकारने असे केले नाही.एवढेच नाही तर ४५ लाख गरीब कुटुंबियांना राशन कार्डवर मिळणारी साखर बंद केली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून आता गरिबांना साखर मिळणार नाही. जीवनावश्यक वस्तूची भाववाढ, विजेची दर वाढ करून जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. विदेशी बँकेतील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याची मोदी सरकारची घोषणा फसवी ठरल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले. १५ लाखांपैकी पाच रुपये तरी जनतेला मिळाले का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षांकडून रविवारी हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधी नारे देत 'मेरा पी.एम. फेकू है' असे हातावर गोदवून घेतले.या आंदोलनात मनीष जैस्वाल, राजू जाजुरले, गिरीधर कष्टी, मिलिंद भोयर, शिरोमणी स्वामी, नलिनी आत्राम, दुर्गा ठाकरे, स्वाती भोयर, इकबाल सिद्दीकी, रामभाऊ ताजने, चिंतामणी आत्राम, विनोद लांबट, जयश्री सरोदे, माया डोंगरे, शंकर खैरे, आदर्श आवारी, समर्थ बोढे, अजय ठाकरे, विकास धनदरे, पुरुषोत्तम कुडे, नारायण निखाडे, गोपाळ घाटे, निखिल सरोदे, मंगेश मासाडे, सोमदेव कोहाड, सचिन भोयर, शुभम चांभारे, अमोल सेलकर, सलीम पटेल, इकबाल शेख, चरण मोडक व शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक आश्वासन फसवे- विजय देवतळेतीन वर्षांपासून भाजपा सरकार खोटे आश्वासन देऊन केंद्रात व नंतर राज्यात बसली. मात्र या तीन वर्षात या सरकारने फेकू आश्वासन देऊन जनतेची फक्त दिशाभूल केलेली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येणार अशी केवळ अफवा पसरवली. विदेशातील काळ्या पैशाचे काय झाले काहीच माहीत नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारे आता मूग गिळून आहेत. मुलांच्या परीक्षेच्या वेळेस लोडशेडिंग करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या फेकू सरकारने केले आहे. यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे रविवारी धरणे आंदोलन व हातावर ‘हमारा पी.एम. फेकू है' असे गोदवून या सरकारचा निषेध करीत असल्याचे डॉ. विजय देवतळे यावेळी म्हणाले.