शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

हातावर गोंदविले ‘मेरा पीएम फेकू है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:18 IST

वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देघोषणाबाजी : सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आगळेवेगळे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे आज रविवारी स्थानिक गांधी चौकात ‘मेरा पी. एम. फेकू है’ असे हातावर गोदवून आगळेवेगळे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी धरणेही देण्यात आले.यावेळी काँग्रेस नेते डॉ. विजय देवतळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तथा जि.प. सदस्य सुनंदा जीवतोडे, जिल्हा काँ्रग्रेस कमेटीच्या सचिव तथा जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी जि.प. सदस्य कैन्हय्यालाल जयस्वाल, पं.स. सदस्य संजीवनी भोयर, जेष्ठ नेते वसंत विधाते, नगरसेवक विठ्ठल टाले, पुरुषोत्तम निखाडे उपस्थित होते.कॉग्रेस सरकारला गॅस सिलिंडर ३९६ रुपयांपर्यंत नेण्यास ४५ वर्ष लागली. मात्र भाजप सरकारने तीन वर्षात ३९६ रुपयांचे सिलिंडर ७८४ रुपयांपर्यंत पोहचविले. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होत असनानाही पेट्रोल - डिझेलची भरमसाठ दरवाढ झाली आहे. एका महिन्यात पेट्रोलच्या किमतीत १६ रुपयांची दरवाढ करण्यात आली. शेतमालाचा उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा जोडून हमीभाव देण्याची घोषणा करण्याºया भाजप - सेना सरकारच्या कार्यकाळात शेतमालाला भाव नाही. तसेच शेतकºयांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. किचवट नियमामुळे कर्जमाफी फसवी ठरली आहे,नोटबंदीमुळे काळा पैसा सापडलाच नाही. मात्र सामान्य नागरिकांची वाट लागली. उद्योग धंदे डबघाईस आले असून अर्थ व्यवस्थेची पुरती वाट लागली आहे. दरवर्षी देशात दोन करोड नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मोदी सरकारने केली. मात्र प्रत्यक्षात सरकारने असे केले नाही.एवढेच नाही तर ४५ लाख गरीब कुटुंबियांना राशन कार्डवर मिळणारी साखर बंद केली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून आता गरिबांना साखर मिळणार नाही. जीवनावश्यक वस्तूची भाववाढ, विजेची दर वाढ करून जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. विदेशी बँकेतील काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याची मोदी सरकारची घोषणा फसवी ठरल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले. १५ लाखांपैकी पाच रुपये तरी जनतेला मिळाले का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षांकडून रविवारी हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधी नारे देत 'मेरा पी.एम. फेकू है' असे हातावर गोदवून घेतले.या आंदोलनात मनीष जैस्वाल, राजू जाजुरले, गिरीधर कष्टी, मिलिंद भोयर, शिरोमणी स्वामी, नलिनी आत्राम, दुर्गा ठाकरे, स्वाती भोयर, इकबाल सिद्दीकी, रामभाऊ ताजने, चिंतामणी आत्राम, विनोद लांबट, जयश्री सरोदे, माया डोंगरे, शंकर खैरे, आदर्श आवारी, समर्थ बोढे, अजय ठाकरे, विकास धनदरे, पुरुषोत्तम कुडे, नारायण निखाडे, गोपाळ घाटे, निखिल सरोदे, मंगेश मासाडे, सोमदेव कोहाड, सचिन भोयर, शुभम चांभारे, अमोल सेलकर, सलीम पटेल, इकबाल शेख, चरण मोडक व शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.प्रत्येक आश्वासन फसवे- विजय देवतळेतीन वर्षांपासून भाजपा सरकार खोटे आश्वासन देऊन केंद्रात व नंतर राज्यात बसली. मात्र या तीन वर्षात या सरकारने फेकू आश्वासन देऊन जनतेची फक्त दिशाभूल केलेली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येणार अशी केवळ अफवा पसरवली. विदेशातील काळ्या पैशाचे काय झाले काहीच माहीत नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ म्हणणारे आता मूग गिळून आहेत. मुलांच्या परीक्षेच्या वेळेस लोडशेडिंग करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या फेकू सरकारने केले आहे. यामुळे आम्ही काँग्रेस पक्षातर्फे रविवारी धरणे आंदोलन व हातावर ‘हमारा पी.एम. फेकू है' असे गोदवून या सरकारचा निषेध करीत असल्याचे डॉ. विजय देवतळे यावेळी म्हणाले.