शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कचरा वेचणाऱ्या चिमुकल्यांसोबत उभारली भावस्पर्शी गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:53 IST

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही.

ठळक मुद्देगाडगेबाबा वाचनालयाची सामाजिक बांधिलकी : मराठी नववर्षाची अनोखी भेट

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडवा सणाचे समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. चिमुकले जीव तर सणवाराला हरखून जातात. मात्र प्रत्येकांच्या जीवनात आनंदाचा व उत्सवाचा क्षण येतो, असे होत नाही. उकीरड्यावर कचºया वेचणाºया चिमुकल्यांच्या नशिबी तर दारिद्र्य पाचवीलाच पूजले असते. समाज व्यवस्था याकडे सदैव दुर्लक्ष करते. अशातही काही संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. भावस्पर्शी व स्नेहाची अनोखी गुढी उभारून सामाजिक बांधिलकीचा परिचय देत आहेत. असाच प्रसंग बल्लारपूर येथे रविवारी दिसून आला. येथील संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने कचरा वेचणाºया चिमुकल्यासोबत भूतकाळातील स्वप्ने विसरायला लावणारी भावस्पर्शी गुढी उभारल्याच वास्तव समोर आले.मराठी माणूस संस्कृतीची जोपासना करणारा आहे. संस्कृतिला उत्सवाची जोड देणारा आहे. यात सामाजिक भाण ठेवणाराही आहे. सुखसमृद्धीची गुढी उभारून नव्या वर्षात वाटचाल करताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी पुढे आल्याचा प्रत्यय यातून दिसून येतो. बल्लारपुरात ज्या चिमुकल्यांची पहाट कचरा वेचण्यासाठी हातात थैली घ्यावी लागते. पोेटाची खळगी भरण्यासाठी उकीरडा लागतो. रस्तोरस्ती कचºयांसाठी भटकंती करावी लागते. त्यातून मिळणाºया मोबदल्यावर पोटातील आग विझवावी लागते. शहरातील हे चित्र नेहमीचे आहे. अशा चिमुकल्यांच्या नशिबी सणाला गोडधोड तर दुर्लभच, अशा चिमुकल्यांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याचे कार्य येथील सामाजिक बांधिलकी जोपासणारे श्रीनिवास सुंचूवार यांनी केले. श्री लक्ष्मी नृसिंह सहकारी पतसंस्था व संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाने उकीरड्यावर कचरा वेचणाºया शेकडो मुलांना खेळातील वस्तू दिल्या. पुरणपोळीचा आपुलकीच्या भावनेतून मायेचा घास भरविला. गोड गाठी देवून गुढी पाडव्याची भावस्पर्शी गुढी उभारली.यावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विकास अहीर, माजी नगरसेवक वर्षा सुंचूवार, नायब तहसीलदार दुर्गा पुरोहित, हेमा डंबारे, माया मुदगल, मंडळ अधिकारी दिलीप भडके, पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अजय मेकलवार, सुनील दडमल, दत्तराज कुळसंगे, आशिष समुद्रवार आदींनी उपस्थिती दर्शवून सामाजिक बांधिलकीची उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. गुढी पाडव्याचे औचित्यसाधून भावनेला स्पर्श करणारी गुढी उभारण्याचा प्रसंग समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे.