शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

पालकमंत्री कार्यालय जनसेवेत रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली.

ठळक मुद्देविकासाला गती : विजय वडेट्टीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पालकमंत्री कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन पार पडले.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ यांनी केले. जिल्हा प्रशासनात कार्य करणाºया प्रत्येक विभाग प्रमुखाच्या कामकाजाची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी माहिती घेतली. २० जानेवारी २०२० रोजी विभागनिहाय आढावा आणि २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन विभागाची बैठक होणार आहे.५९ हजार बँकखाते आधारकार्ड संलग्नजिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चे सादरीकरण यावेळी केले. सदर योजनेतंर्गत जिल्ह्यात ९० टक्के शेतकºयांनी आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न केले. जिल्ह्यात ६० हजार ८०० पात्र बँकखाते आहेत. त्यापैकी ५९ हजार खात्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न झाले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व शेतकºयांची नोंदणी व खात्याची तपासणी पूर्ण होणार असल्याची माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सादर केली.धनगर समाजाने योजनांचा लाभ घ्यावाधनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे राहू नये, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने योजना तयार केली आहे. भटक्या समाजाला स्थिरता मिळावी, यासाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार