शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

पालकमंत्री कार्यालय जनसेवेत रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली.

ठळक मुद्देविकासाला गती : विजय वडेट्टीवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणी विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पालकमंत्री कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन पार पडले.यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या दालनाची पाहणी करून संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर नियोजन भवनात सर्वविभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ यांनी केले. जिल्हा प्रशासनात कार्य करणाºया प्रत्येक विभाग प्रमुखाच्या कामकाजाची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी माहिती घेतली. २० जानेवारी २०२० रोजी विभागनिहाय आढावा आणि २५ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन विभागाची बैठक होणार आहे.५९ हजार बँकखाते आधारकार्ड संलग्नजिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ चे सादरीकरण यावेळी केले. सदर योजनेतंर्गत जिल्ह्यात ९० टक्के शेतकºयांनी आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न केले. जिल्ह्यात ६० हजार ८०० पात्र बँकखाते आहेत. त्यापैकी ५९ हजार खात्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न झाले. फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व शेतकºयांची नोंदणी व खात्याची तपासणी पूर्ण होणार असल्याची माहितीही पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे सादर केली.धनगर समाजाने योजनांचा लाभ घ्यावाधनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे राहू नये, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने योजना तयार केली आहे. भटक्या समाजाला स्थिरता मिळावी, यासाठी ग्रामीण भागात घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री वडेट्टीवार यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार