शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखविलेलया विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावरच आज केंद्र्रात, राज्यात, जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत भाजपाची सत्ता आहे.

सुधीर मुनगंटीवार : भटाळी येथे शेतकरी शिवार संवादयात्राचंद्रपूर : जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखविलेलया विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावरच आज केंद्र्रात, राज्यात, जिल्हा परिषदेत, पंचायत समितीत भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मतदार बंधू भगिनींचे आभार माणण्यासाठी तसेच त्यांची निरंतर सेवा करण्याबाबत त्यांना आश्वस्त करण्यासाठी शेतकरी शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून मी येथे आलो आहे. या जिल्हयाचा विकास करण्यासाठी आणि जनतेची अविरत सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपातर्फे चंद्रपूर तालुक्यातील भटाळी येथे आयोजित शेतकरी शिवार संवादयात्रा व मतदार संपर्क अभियान कार्यक्रमात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते पंतप्रधान नसून प्रधानसेवक असल्याचे म्हटले आहे. ही सेवेची भावना हा भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिलेला संस्कार आहे. हजारों शहिदांनी, वीरांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आम्हाला शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, उपेक्षित, वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी दिला आहे. ज्यांच्या हातात ५० वर्षे सत्ता होती, त्यांनी सत्तेला उपभोगाचे साधन समजले. आम्ही सत्तेला सेवेचे माध्यम मानणारे आहोत, असेही ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लोककल्याणकारी योजना दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा योजना, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याची योजना, स्टार्टअप, स्टॅन्डअप योजना, उज्ज्वला गॅस योजना, १२ रूपयांत अपघात विमा योजना, कामगारांसाठी योजना अशा विविध योजनांची मोठी मालिका जनतेला दिली. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही मागेल त्याला शेततळे, विहिरींची योजना, अर्थसहाय्याची, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. पतपुरवठा, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आदीच्या माध्यमातून शेती व्यवथा बळकट करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. सिंचनाच्या योजनांसाठी पुरेसा निधी आम्ही उपलब्ध केला असून गेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी दिलेल्या निधीला कात्री लावणार नाही आणि जर लावली तर पुढचा अर्थसंकल्प मांडणार नाही अशी ग्वाही मी राज्यातील जनतेला दिली होती. त्यानुसार सिंचनासाठी जाहीर केलेला निधी उपलब्ध केला. सरकार आपले वाटावे अशा पध्दतीने कार्यरत आहे, असेही ते म्हणाले.विचोडा (बु.) येथे बंधाऱ्याचे लोकार्पणभटाळी येथील कार्यक्रमापूर्वी चद्रपूर तालुक्यातील विचोडा (बु.) येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जलपूजन करून केले. त्याचप्रमाणे या गावात सामाजिक सभागृहाचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती ब्रीजभूषण पाझारे, नामदेव डाहुले, प्रकाश धारणे, सरपंच किरणताई डोंगरे, अनिल डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य रणजित सोयाम, किरण बांदुरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी विचोडा (बु.) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.