शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

वाढीव गृहकराने मूलकरांची उडाली झोप

By admin | Updated: November 23, 2015 00:55 IST

नगर विकासासाठी संवेदनशील नसलेल्या मूल नगर प्रशासनाने सन २०१५-१६ या वर्षात चक्क चारपट गृहकर वाढविण्याचा प्रयत्न चालविला असून त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

नगर परिषद : सभेत २५ टक्के करवाढीचा प्रस्तावमूल : नगर विकासासाठी संवेदनशील नसलेल्या मूल नगर प्रशासनाने सन २०१५-१६ या वर्षात चक्क चारपट गृहकर वाढविण्याचा प्रयत्न चालविला असून त्यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. नगर परिषदेच्या सभेत पदाधिकारी व नगरसेवकांनी एकूण गृहकरावर २५ टक्के वाढ करावी, असा प्रस्ताव पारित केला आहे. मात्र पालिकेने गेल्या २० वर्षापासून गृहकर न वाढविल्याने जिल्हाधिकाऱ्याने गृहकर वाढविण्याबाबत पत्र पाठविले आहे. गेल्या २० वर्षापासून टप्प्या-टप्प्याने गृहकर वाढविणे आवश्यक असताना तत्कालीन पदाधिकारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आता त्याचा सरळ फटका नागरिकांना बसणार आहे. नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९६५ मधील कलम ११९ पोट कलम १ अन्वये सन २०१५-१६ ते २०१८-१९ या वर्षापर्यंत सरसकट चार ते पाच पट फेर मुल्यांकनाची आकारणी करुन नागरिकांना नोटीस पाठविली आहे. तसेच अधिनियम १९६५ मधील कलम १२० अन्वये आपली काही उजर वा आपेक्ष असल्यास ३० दिवसाच्या आत लेखी सादर करण्याबाबत कळविले आहे. जवळपास सर्वच नागरिकांनी आक्षेप घेत लेखी पत्र सादर केले आहे. नियमानुसार दर चार वर्षानी फेरमूल्यांकन करून कर वाढविणे आवश्यक होते. मात्र तत्कालीन पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी कर वाढ केली नाही. ही बाब जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या लक्षात येताच त्यांनी करवाढ करण्याबाबत कळविले. त्याचा आधार घेत मुख्याधिकारी यांनी करवाढ करण्यासाठी नोटीस बजावली आहे. नागरिकांच्या मते २० वर्षांची सरसकट करवाढ करणे म्हणजे सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असून तत्कालीन प्रशासनाने केलेली चूक सर्वसामान्यांवर लादणे उचित नसल्याचे म्हटले आहे. विकासाबाबत संवेदनशील नसणाऱ्या पालिका प्रशासनाने नागरिकांना विविध सोई-सुविधा पुरवाव्यात. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने कर वाढ करावी. सरसकट वाढ करणे म्हणजे नागरिकांचे आर्थिक शोषण करण्याचा प्रकार असल्याचे, मत व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष पसरला असून पालिका प्रशासन नागरिकांना सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ही गृहकर वाढ थांबविण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)नगर परिषद स्थापनेनंतर सन १९९२ ला दोन टक्के करवाढ करण्यात आली होती. त्यानंतर दर वेळेस दोन ते तीन टक्के वाढ केली जात होती. मात्र प्रत्यक्षात सर्वेक्षण करून गृहकर आकारले गेले नव्हते. यावेळी प्रत्यक्ष घराचे सर्वेक्षण व मोजणी करून मूल्यांकन केले आहे. मूल्यांकनाप्रमाणे करवाढ केली नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन, अंशदान, पेंशन आदी सुविधा शासन पुरविणार नाही. करवाढ चार ते पाच पट वाढणार नसून मर्यादित वाढेल.- रवींद्र ढाके, मुख्याधिकारी न.प. मूलपालिकेने सभेत २५ टक्के करवाढ करण्याचा ठराव पारित केलेला आहे. करवाढ ही गेल्या २० वर्षापासून करण्यात आली नाही. ही बाब तत्कालीन प्रशासनाची चूक आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरणे उचीत नाही. मुख्याधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून कुणावरही अतिरिक्त भार पडणार नाही, याकडे लक्ष द्यावे.- प्रशांत समर्थ, सभापती बांधकाम न.प. मूल