शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

युवकांचे जत्थे परराज्यात

By admin | Updated: May 16, 2015 01:42 IST

१८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या ...

ब्रह्मपुरी : १८ ते ३० वयोगटातील मुला-मुलींची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळत नसल्याने कामाच्या निमित्ताने ठेकेदाराच्या मध्यस्थीने त्यांना परराज्यात नेऊन अल्पदरात काम करवून घेतले जात आहे. यात काही प्रमाणात त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषणही केले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे.शासनाच्या योजना चांगल्या असूनही योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबविल्या जात नसल्याने अनेक बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कसे घ्यायचे, हा प्रश्न समोर उभा ठाकतो. दोन-चार महिने कुठे तरी काम करावे, असा प्रयत्न सुरू असतो. परंतु शहरात व तालुक्यात एमआयडीसीची निर्मिती अजूनही झाली नाही व मोठमोठ्या कारखान्याच्या निर्मितीचाही अभाव असल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या दुकानात नोकर राहण्यापलीकडे दुसरा रोजगार सध्या तालुक्यात अस्तित्वात नाही. म्हणून बेरोजगारांनी परराज्यात जाऊन काम करणे पसंत केले आहे. भरारमेंढा, किन्ही, किरमिरी (मेंढा) हळदा, आवळगाव व अन्य भागातून अनेक बेरोजगार बंगलोर, हैद्राबाद, कोलकत्ता अशा मोठ्या महानगरात स्थानिक ठेकेदारांच्या मध्यस्थीने नेऊन त्यांच्याकडून काम करवून घेतले जात आहे. या कामाचा मोबदला देताना त्यांची काही प्रमाणात शारीरिक व मानसिक तसेच आर्थिक शोषणही केले जात असल्याची माहिती परतून आलेले युवकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली. शासनाने अनेक योजनांचा गाजावाजा करुन फक्त कागदावरच त्या गुंडाळलेल्या असल्याने बेरोजगारांना दारोदार भटकंती करण्याची दरवर्षी वेळ येत असल्याचीही भावना बेरोजगार युवक व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील जवळजवळ ५०० ते ६०० बेरोजगार युवक विविध कंपन्यांच्या कामावर आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ इत्यादी राज्यात कामांना गेल्याचे दिसून येत आहे. एखाद्या दुकानासाठी अथवा व्यवसायासाठी बँकेने कर्ज द्यायचे म्हटले तर अनेक कागदपत्रांची पूर्तता करणे अवघड काम असते व गॅरंटीचा प्रश्नही समोर उभा राहतो. दुकान किंवा व्यवसाय उभारण्यासाठी बेरोजगारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहत असते. शासनस्तरावर काही अटी शिथिल केल्यास बेरोजगारांना सहज कर्ज मिळेल, अशी सोय करून देण्याचीही मागणी बेरोजगारांकडून केली जात आहे. मोठ्या पैशाच्या आमिषाला बळी पडून बेरोजगारांचा हिरमोड होऊन परतावे लागत असल्याचेही दिसून आले आहे. सुरुवातीला मध्यस्थी करणारा स्थानिक ठेकेदार कंपनीच्या दारापर्यंत दिसतो. नंतर तो ठेकेदार भूमिगत होत असल्याने बेरोजगारांना परराज्यात वालीच उरत नसल्याने जे मिळेल ते खाऊन आपत्तीचा भार सहन करीत त्यांचे आयुष्य जगणे सुरू असते. विशेष म्हणजे, परराज्यात गेलेल्या या बेरोजगारांच्या असहायतेचा फायदा घेत कंपनी व्यवस्थापन त्यांच्याकडून अवजड व जादा काम करवून घेत असल्याचीही माहिती आहे. गरजवंत असल्याने हे बेरोजगार याबाबत काहीही बोलत नाही. मजुरी देतानाही त्यात दांडी मारली जाते. बेरोजगारांच्या समस्येकडे शासनाने दुर्लक्ष न करता त्यावर उपाययोजना करून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्यातील बेरोजगार युवक करीत आहेत. अन्यथा दिवसेंदिवस बेरोजगारीच्या भस्मासूर वाढून भयानक रूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)उद्योगांचा अभावस्थानिक पातळीवर स्वातंत्र्याची ७० वर्ष पूर्ण होत असतानाही एमआयडीसीची निर्मिती झाली नसल्याने बेरोजगारांना इतर राज्यात कामासाठी जावे लागत असते. ब्रह्मपुरी येथे एमआयडीसीची मागणी जुनी असून फक्त जागा सीमांकित करून फलक लावण्यात आले आहे. परंतु एकही लहान मोठा उद्योग सुरू झाला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून बेरोजगारी वाढली आहे.