शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या शिल्पकार राणी हिराईला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देकृतज्ञता : देखणी मंदिरे, शेती व पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण करण्यात योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर नगरीच्या शिल्पकार आणि लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून देशभरातील तत्कालीन अनेक राजवटींमध्ये स्वत:च्या लक्षवेधी ठरलेल्या गोंड राणी हिराई यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त विविध आदिवासी संघटना तसेच चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, वरोरा, चिमूर, गोंडपिपरी, सावली, मूल, पोंभुर्णा तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी लॉकडाऊनमुळे घराघरात कौटुंबीक कार्यक्रम घेऊन अभिवादन केले.जिवती येथील मूलनिवासी एकता संघर्ष समितीच्या वतीने राणी हिराईला अभिवादन करण्यात आले. कंटू कोटनाके जिल्हाध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघ यांनी यावेळी सांगितले आहे. आणि अशा महान राणीला जयंतिनिमित्य अभिवादन करताना. यावेळी मूळनिवासी एकता समितीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मण मंगाम, मुख्याध्यापक लिंगोराव सोयाम, आदिवासी विद्यार्थी संघाचे कंटू कोटनाके, संजू मडावी, प्रकाश कोटनाके, रवी मेश्राम, विलास आत्राम, भाग्यश्री मंगाम, आदी उपस्थित होते. बल्लारपूर व चंद्रपूर राजवटीत २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक होय. राणी हिराईचे माहेर मध्य प्रदेशातील मदनापूरचे. त्यांचे वडील सरदार होते. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच मिळाले. वीरशहा गादीवर बसला. राणी हिराईचा त्यांच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजवली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि राज्य कारभार बघू लागल्या. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला कल्याणकारी राज्य व्यवस्थेतून संस्कारीत केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. मात्र, त्याला निधड्या छातीने प्रतिकार केला. राणी स्वत: रणांगणावर उतरली. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. मात्र, राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर, महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा व हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविली, अशी माहिती प्रा.लक्ष्मण मंगाम यांनी दिली.चंद्रपूरच्या विकासात बहुमोल वाटा- आचार्य टी. टी. जुलमेचंद्रपूर नगरीच्या प्रजेचे हित जोपासत राणी हिराईने देखणी मंदिरे उभारली. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली चंद्रपुरातील मंदिरे व अन्य बआंधकाम केले. प्रजेला शेती आणि पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता पायाभूत सुविधा निर्माण केल्या. केवळ जनतेच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून प्रजेला सुखी ठेवण्यात राणी हिराई यशस्वी झाल्या होत्या. त्या युद्ध कौशल्यात निपून होत्या. त्यामुळे राणी हिराईच्या कर्तृत्वाची दखल इतिहासकारांनी घेतली. राणी हिराईच्या कर्तृत्वामुळेच आजच्या चंद्रपूरला विकासाचे आधुनिक वळण घेतला आले, असे मत गोंड राजवटीचे अभ्यासक आचार्य टी. टी. जुलमे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक