शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक शहरात; गाव विकास भकास ! ग्रामसेवकांना मुख्यालयाची ॲलजी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:59 IST

मूल तालुक्यातील विदारक वास्तव : कसे होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यांच्यातील विकासात्मक दुवा समजाला जातो. मात्र, मूल पंचायत समितींतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमधील एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गाव विकासाला खीळ बसली आहे. बरेचशे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणावरून, तर काही ग्रामसेवक जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत आहेत. त्यामुळे गावाचा विकास कसा होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत. 

मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे. मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या सर्व योजना गावातील सर्व घटकांपर्यंत सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केलेल्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. मात्र, मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय सुद्धा घेतला आहे. मात्र, ग्रामसेवकाकडून शासन नियमांची पायमल्ली केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सभेलाही ग्रामसेवकांची दांडीमूल तालुक्यातील काही ग्रामसेवकांकडे अनेक ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थिती असते. बरेचदा ग्रामसभा व मासिक सभेला सुद्धा ग्रामसेवक दांडी मारतात. ग्रामसेवक गावात साधे फिरकूनही पाहत नसल्याने गावातील कोणता वार्ड कुठे आहे? याची साधी माहिती सुद्धा त्यांच्याकडे नसते. त्यांच्यामुळे गावातील सांडपाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था यासारख्या अनेक समस्यांवर योग्य उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरतात. त्यामुळे आजही अनेक गावात योग्य मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.

४९ ग्रामपंचायतीचा कारभारच ढेपाळलाग्रामपंचायत मूल तालुक्यात आहेत. त्यातुलनेत केवळ २९ ग्रामसेवक तालुक्यात कार्यरत आहेत. त्यातही ते मुख्यालयी राहत नाहीत.

"ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांचे कामे वेळेत होत नाही. अशातच एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. परिणामी, नागरिकांना एकाच कामासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे."- अनिल सोनुले, जिल्हा सहसचिव, अखिल भारतीय सरपंच परिषद.

"ग्रामसेवक नियमित येत नसल्याने कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये पायपीट करावी लागते. शासनाने ग्रामसेवकांना गावातच मुख्यालय राहणे बंधनकारक करावे, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत होतील."- सूरज हजारे, नागरिक

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrapur-acचंद्रपूर