शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

ग्रामसेवक शहरात; गाव विकास भकास ! ग्रामसेवकांना मुख्यालयाची ॲलजी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:59 IST

मूल तालुक्यातील विदारक वास्तव : कसे होणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : ग्रामसेवक हा गाव आणि सरपंच यांच्यातील विकासात्मक दुवा समजाला जातो. मात्र, मूल पंचायत समितींतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमधील एकही ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गाव विकासाला खीळ बसली आहे. बरेचशे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणावरून, तर काही ग्रामसेवक जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत आहेत. त्यामुळे गावाचा विकास कसा होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत. 

मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे. मात्र, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक गावाला पूर्णवेळ देण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे मात्र कोडेच आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जातात. या सर्व योजना गावातील सर्व घटकांपर्यंत सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केलेल्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले. मात्र, मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले सादर करीत असतात. गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय सुद्धा घेतला आहे. मात्र, ग्रामसेवकाकडून शासन नियमांची पायमल्ली केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

सभेलाही ग्रामसेवकांची दांडीमूल तालुक्यातील काही ग्रामसेवकांकडे अनेक ग्रामपंचायतीचा डोलारा असल्याने स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थिती असते. बरेचदा ग्रामसभा व मासिक सभेला सुद्धा ग्रामसेवक दांडी मारतात. ग्रामसेवक गावात साधे फिरकूनही पाहत नसल्याने गावातील कोणता वार्ड कुठे आहे? याची साधी माहिती सुद्धा त्यांच्याकडे नसते. त्यांच्यामुळे गावातील सांडपाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था यासारख्या अनेक समस्यांवर योग्य उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरतात. त्यामुळे आजही अनेक गावात योग्य मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.

४९ ग्रामपंचायतीचा कारभारच ढेपाळलाग्रामपंचायत मूल तालुक्यात आहेत. त्यातुलनेत केवळ २९ ग्रामसेवक तालुक्यात कार्यरत आहेत. त्यातही ते मुख्यालयी राहत नाहीत.

"ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने नागरिकांचे कामे वेळेत होत नाही. अशातच एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. परिणामी, नागरिकांना एकाच कामासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे."- अनिल सोनुले, जिल्हा सहसचिव, अखिल भारतीय सरपंच परिषद.

"ग्रामसेवक नियमित येत नसल्याने कामासाठी ग्रामपंचायतीमध्ये पायपीट करावी लागते. शासनाने ग्रामसेवकांना गावातच मुख्यालय राहणे बंधनकारक करावे, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत होतील."- सूरज हजारे, नागरिक

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतchandrapur-acचंद्रपूर