शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

वृक्षारोपण मोहिमेला ग्रा.पं.चा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:10 IST

शासनस्तरावर ३३ कोटी वृक्ष लागवड नियोजनाचा आराखडा तयार झाला आहे. ग्रामपंचायतस्तरावर यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन हजार ४०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले. परिणामी, जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वर्षे नऊ महिने कालावधी दरम्यान ४५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतालुका सरपंच संघटनेचा विरोध : जिल्हा परिषदने दिले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

अनेकश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनस्तरावर ३३ कोटी वृक्ष लागवड नियोजनाचा आराखडा तयार झाला आहे. ग्रामपंचायतस्तरावर यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन हजार ४०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले. परिणामी, जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वर्षे नऊ महिने कालावधी दरम्यान ४५ लाखांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाला तालुक्यातील सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविल्याने पर्यावरण बचावसाठी असलेल्या वृक्षारोपण मोहिमेला ग्रामपंचायतींचा अडथळा दिसत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली. यावर्षी राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय निश्चित केले. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जि. प प्रशासनाने ग्रामपंचायतीला २० मेपर्यंत खड्डे खोदकाम करून संकेतस्थळावर माहिती देण्याचे निर्देश दिले. यासाठी वन विभागाकडे वृक्ष लागवड, रानमाळा वृक्ष लागवड व कन्या वन समृद्धी वृक्ष लागवडीला रोपांची मागणी आठ दिवसांत करावी लागणार आहे. ग्रामपंचायतनिहाय वन विभागाला मागणी पत्र सादर करून रोपांची उपलब्धता निश्चित करण्याचे आदेशात आहे. सदर कामासाठीच्या खर्चाची तरतूद १४ व्या वित्त आयोगामधून करण्याचे सांगण्यात आले. याला सरपंच संघटनांची विरोध केला आहे. यापूर्वी वृक्ष लागवडीचा संपूर्ण खर्च मनरेगा योजनेच्या निधीतून करण्याचे नियोजन करण्यात आले. मनरेगा योजनेच्या माध्यमातून रोपे लागवडीची पूर्वतयारी रोपांची लागवड, संगोपन व संरक्षण यासाठी ४५ लाख रूपये खर्चाचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचा खर्च मनरेगा व्यतिरिक्त लोकसहभाग, सीएसआर निधी, ग्रामनिधी, १४ वा वित्त आयोग, पेसा व इतर योजनेतून वृक्ष लागवडीचे नियोजन करण्याचे सांगण्यात आले. विशेषत: १४ व्या वित्त आयोगाचा खर्चासाठी आधार घ्यावा, असेही म्हटले आहे.जिल्हा परिषद प्रशासनाच्या वृक्ष लागवडीचा आदेश पालन करण्यास ग्रामपंचायती सक्षम नाहीत, असे स्थानिक पदाधिकाºयांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतींचे उत्पन्न जेमतेम आहे. स्वच्छता, दिवाबत्तीची सोया, पाणी पुरवठा, ग्रामपंचायत कर्मचारी वेतन हाच खर्च भागवता येत नाही. यातच वृक्ष लागवडीच्या खर्चाचा भार कसा पेलावा, असा प्रश्न ग्रामपंचायतचे पदाधिकारी विचारत आहेत. या विरोधामुळे पर्यावरण बचावसाठीच्या शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिम अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यंदाची वृक्ष लागवड मोहीम ग्रामपंचायतींना खर्चाच्या बाबतीत वेठीस धरणारी आहे. बल्लारपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना उद्योजकांकडून सीएसआर निधी मिळत नाही. प्रदूषण करण्यास याच कंपन्या कारणीभूत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आवश्यक आहे. मात्र लागवडीनंतर संगोपनासाठी लागणारा निधी शासनाने खर्च करावा. हा खर्च ग्रामपंचायतींना झेपणारा नाही.- मोरेश्वर लोहे, अध्यक्ष,सरपंच संघटना, बल्लारपूर

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतforest departmentवनविभाग