शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

ग्रामोदय संघाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:36 IST

अखेरच्या घटका मोजत असलेले येथील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ग्रामोदय संघाला पूर्ववत आणू, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. तालुका व शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । विविध पक्षांच्या वतीने सत्कार, बाळासाहेब प्रवेशद्वारापासून काढली स्वागत रॅली

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : अखेरच्या घटका मोजत असलेले येथील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ग्रामोदय संघाला पूर्ववत आणू, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

तालुका व शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.ग्रामोदय संघात सध्या तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंना बाजारात पाहिजे तशी मागणी नसल्याने हा संघ डबघाईकडे जात आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार याठिकाणी सिरॅमिकच्या (मातीच्या) वस्तूंचे आधुनिक पद्धतीने उत्पादन सुरू करून पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी कुशल व अकुशल अशा पाच हजार कामागारांना काम दिले जाईल. असेही ते यावेळी म्हणाले.अध्यक्षस्थानी मोरेश्वर टेमुर्डे, प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते डॉ.विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, भगतसिंग मालुसरे, दिलीप ठेंगे, धनंजय गुंडावार, विठ्ठल मांडवकर, नगरसेवक सरीता सूर, प्रेमदास आस्वले, शामसुंदर पोडे, सुभान सौदागर, धर्मेंद्र हवेलिकर, छोटू पारोधे, प्रतिभा धानोकर, वच्छला धानोरकर, चिंतामन आत्राम, सुधाकर आत्राम, मुनाज शेख, रोहणकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक लक्ष्मण बोढाले, संचालन भगतसिंग मालुसरे यांनी केले.जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरु करूआयुध निर्माणी, कोळसा खाणी आणि बंद पडलेले जिल्ह्यातील उद्योगाकडे आपण विशेष लक्ष देणार असून ते सुरु करण्यासाठी पूरेपुर प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. बंद पडलेली एम्टा कोळसा खाण सहा महिन्याच्या आत सुरू करून बेरोजगारांच्या हाताला काम दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.